शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जि.प.च्या सभेत वैयक्तिक लाभाच्या योजनांना मंजुरी

By admin | Updated: August 13, 2014 00:26 IST

हिंगोली : जि.प.च्या सर्वसाधारण सभेत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

हिंगोली : जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यासाठी मान्यता देण्यात आली. या सभेला जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, सभापती रंगनाथ कदम, राजाभाऊ मुसळे, निलावती सवंडकर, मधुकर कुरुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांची उपस्थिती होती.अर्थसंकल्यपास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत चर्चा झाली. अर्थसंकल्पात सहा महत्त्वाचे बद करण्याबाबत चर्चेदरम्यान ठरले. यावेळी वैयक्ति लाभाच्या योजनांसाठी समाजकल्याण विभागास ९0 तर महिला व बालकल्याणला ५३ लाख देण्यास मान्यता देण्यात आली. तेच तेराव्या वित्त आयोगाच्या दीड कोटींवर निधीच्या नियोजनास मान्यता दिली. त्याचबरोबर बीआरजीएफ योजनेच्या आराखड्यासही मान्यता देण्यात आली. जि.प.च्या अखत्यारितील २६ रस्ते सार्वजनिक बांधकामकडून कामे करण्यासाठी ना हरकत देण्यात आली. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते मुनीर पटेल यांनी मांडलेल्या हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या ठरावही एकमताने मंजूर करून शासनाकडे पाठवण्याचे ठरले.चाराटंचाई निवारणार्थ वैरण विकाससाठी दहा लाखांची तरतूद व उर्दूच्या शाळांत काही ठिकाणी गावकरी लोकवर्गणी करून शिक्षकांना वेतन देत आहेत. तेथे शेषमधून पगाराची व्यवस्था करावी, अशी मागणी पटेल यांनी केली.वारंगा परिसरातील भोसी येथे दुपारीच बंद आढळलेल्या शाळेबाबतचा प्रश्न उपस्थित करून तेथील शिक्षकांवर काय कारवाई करणार, असा सवाल जि.प.सदस्य राजेश्वर पतंगे यांनी केला. त्यावर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अहवाल पाठविल्यानंतर कारवाईचे आश्वासन शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी सांगितले.जि.प.सदस्य अनिल कदम यांनी चौथी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मागासवर्गीय शिष्यवृत्तीचे परीक्षा शुल्क शासन भरत असेल तर उर्वरितांचे जि.प.च्या शेषमधून भरण्याची मागणी केली. विनायक देशमुख यांनी पुन्हा एकदा शिक्षकांच्या १00 जागा रिक्त असल्याने सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागी आंतरजिल्हा बदलीत अनुसूचित जाती, जमातीच्या शिक्षकांना संधी देण्याची मागणी केली. मात्र तसे करता येणार नसल्याचे सांगून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवू, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे यांनी सांगितले. जि.प.सदस्य दराडे यांनी येथे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना आंतरजिल्हा बदलीवर येथून शिक्षक बाहेर गेला नाही पाहिजे, अशी मागणी केली. ओम देशमुख यांनी खांबा सिनगी येथील जलस्वराज्य योजना अजूनही कार्यान्वित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर कार्यकारी अभियंता एंबडवार यांनी चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. आखाडा बाळापूर येथील ग्रामपंचायतच्या प्रोसिंडिंगच्या मुद्यावर कळमनुरी गटविकास अधिकारी पुन्हा एकदा निरुत्तर झाल्याचे दिसले.