शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

सव्वासात कोटींच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: April 24, 2016 23:48 IST

परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विंधन विहीर घेणे, नळयोजनांची दुरुस्ती आणि तात्पुरत्या नळयोजनांच्या ३५५ कामांना मंजुरी दिली आहे.

परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विंधन विहीर घेणे, नळयोजनांची दुरुस्ती आणि तात्पुरत्या नळयोजनांच्या ३५५ कामांना मंजुरी दिली आहे. सुमारे ७ कोटी २१ लाख रुपयांची ही कामे असून यापैकी केवळ दीडशे कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. टंचाई निवारणाची कामे संथगतीने होत असल्याने जिल्ह्यातील पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे.परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच ग्रामस्थांना पाणीटंचाईने ग्रासले असल्याने पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नदी-नाले मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून पाण्याने वाहिलेच नाहीत. प्रमुख प्रकल्प कोरडे पडले आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी प्रथमच तीन मीटरने खोल गेली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर प्राधान्याने उपाय करणे गरजेचे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार करुन विविध कामांना तातडीने मंजुरी दिली असली तरी ही कामे मात्र जिल्ह्यात संथगतीने सुरु आहेत. आतापर्यंत टंचाईवर मात करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. जिल्ह्यात १११ विंधन विहिरींना मंजुरी दिली असून त्यापैकी ६० कामे पूर्ण झाली आहेत. ४९ लाख ५० हजार रुपयांचा खर्च या कामावर केला जात आहे. काही गावांमध्ये नळ योजनांची दुरुस्ती झाल्यास तेथील पाणीटंचाई दूर होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ५ कोटी ८८ लाख ३५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. एकूण २२७ कामे मंजूर केली असली तरी केवळ ९७ कामे पूर्ण झाली असून ९६ कामे रखडली आहेत. तात्पुरती पूरक नळयोजनेची १७ कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ ७ पूर्ण झाली असून १० कामे अजूनही प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात आहे. तात्पुरत्या पूरक नळ योजनांच्या कामावर आतापर्यंत ८३ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणाच्या कामांना मंजुरी दिली असली तरी ही कामे तातडीने सुरु केली जात नाहीत. अनेक कामे रखडली आहेत. प्रशासकीय मंजुरीनंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब लागत आहे. जिल्ह्यातील टंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कामे ग्रामीण भागातील ही कामे तातडीने पूर्ण करावित, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)