शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

सव्वासात कोटींच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: April 24, 2016 23:48 IST

परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विंधन विहीर घेणे, नळयोजनांची दुरुस्ती आणि तात्पुरत्या नळयोजनांच्या ३५५ कामांना मंजुरी दिली आहे.

परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विंधन विहीर घेणे, नळयोजनांची दुरुस्ती आणि तात्पुरत्या नळयोजनांच्या ३५५ कामांना मंजुरी दिली आहे. सुमारे ७ कोटी २१ लाख रुपयांची ही कामे असून यापैकी केवळ दीडशे कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. टंचाई निवारणाची कामे संथगतीने होत असल्याने जिल्ह्यातील पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे.परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच ग्रामस्थांना पाणीटंचाईने ग्रासले असल्याने पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नदी-नाले मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून पाण्याने वाहिलेच नाहीत. प्रमुख प्रकल्प कोरडे पडले आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी प्रथमच तीन मीटरने खोल गेली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर प्राधान्याने उपाय करणे गरजेचे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार करुन विविध कामांना तातडीने मंजुरी दिली असली तरी ही कामे मात्र जिल्ह्यात संथगतीने सुरु आहेत. आतापर्यंत टंचाईवर मात करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. जिल्ह्यात १११ विंधन विहिरींना मंजुरी दिली असून त्यापैकी ६० कामे पूर्ण झाली आहेत. ४९ लाख ५० हजार रुपयांचा खर्च या कामावर केला जात आहे. काही गावांमध्ये नळ योजनांची दुरुस्ती झाल्यास तेथील पाणीटंचाई दूर होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ५ कोटी ८८ लाख ३५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. एकूण २२७ कामे मंजूर केली असली तरी केवळ ९७ कामे पूर्ण झाली असून ९६ कामे रखडली आहेत. तात्पुरती पूरक नळयोजनेची १७ कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ ७ पूर्ण झाली असून १० कामे अजूनही प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात आहे. तात्पुरत्या पूरक नळ योजनांच्या कामावर आतापर्यंत ८३ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणाच्या कामांना मंजुरी दिली असली तरी ही कामे तातडीने सुरु केली जात नाहीत. अनेक कामे रखडली आहेत. प्रशासकीय मंजुरीनंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब लागत आहे. जिल्ह्यातील टंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कामे ग्रामीण भागातील ही कामे तातडीने पूर्ण करावित, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)