शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

अपघात विम्याच्या ५६ प्रस्तावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:37 IST

शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले, असून त्यापैकी १३ प्रस्ताव मान्य करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले, असून त्यापैकी १३ प्रस्ताव मान्य करण्यात आले.शेती व्यवसाय करताना शेतकºयांना अनेक अडचणींना तसेच घटनांना सामोरे जावे लागते. अंगावर वीज पडणे, सर्प-विंचू दंश, वीजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे, रस्त्यावरील अपघातामुळे अनेक शेतकºयांचा मृत्यू होतो. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यावर कुटुंबाच्या उदनिर्वाह तसेच आर्थिक परिस्थिीती कमकुवत होते. त्यामुळे शासनाने अपघातग्रस्त शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करण्यासाठी २०१५-१६ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. सदर योजना नॅशनल इंन्सुरन्स कंपनी लि. पुणे या विमा कंपनीमार्फत राबविली जात आहे. शेतकºयांनी स्वत: किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नसते. शासनाकडूनच सर्व खातेदार शेतकºयांचा विमा हप्ता भरण्यात येतो. या विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतात.पात्रता व अटी - राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी, तसेच शेतकरी म्हणून त्याचे नावाचा समावेश असलेला सातबारा, किंवा नमुना ८-अ उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकºयाचे नाव सातबारावर आले असेल, असा संबधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर ६-ड) शेतकºयांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, तर अपघाताच्या स्वरूपानुसार विहित केलेली इतर आवश्यक कागदपत्रे आदींचा समावेश आहे. तालुका स्तरावर परिपूर्ण प्रस्ताव घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा कार्यालयाकडे माहिती सादर करतात, अशी माहिती कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.