शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

अपघात विम्याच्या ५६ प्रस्तावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:37 IST

शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले, असून त्यापैकी १३ प्रस्ताव मान्य करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले, असून त्यापैकी १३ प्रस्ताव मान्य करण्यात आले.शेती व्यवसाय करताना शेतकºयांना अनेक अडचणींना तसेच घटनांना सामोरे जावे लागते. अंगावर वीज पडणे, सर्प-विंचू दंश, वीजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे, रस्त्यावरील अपघातामुळे अनेक शेतकºयांचा मृत्यू होतो. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यावर कुटुंबाच्या उदनिर्वाह तसेच आर्थिक परिस्थिीती कमकुवत होते. त्यामुळे शासनाने अपघातग्रस्त शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करण्यासाठी २०१५-१६ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. सदर योजना नॅशनल इंन्सुरन्स कंपनी लि. पुणे या विमा कंपनीमार्फत राबविली जात आहे. शेतकºयांनी स्वत: किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नसते. शासनाकडूनच सर्व खातेदार शेतकºयांचा विमा हप्ता भरण्यात येतो. या विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतात.पात्रता व अटी - राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी, तसेच शेतकरी म्हणून त्याचे नावाचा समावेश असलेला सातबारा, किंवा नमुना ८-अ उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकºयाचे नाव सातबारावर आले असेल, असा संबधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर ६-ड) शेतकºयांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, तर अपघाताच्या स्वरूपानुसार विहित केलेली इतर आवश्यक कागदपत्रे आदींचा समावेश आहे. तालुका स्तरावर परिपूर्ण प्रस्ताव घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा कार्यालयाकडे माहिती सादर करतात, अशी माहिती कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.