शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

श्रुती भागवतप्रकरणी ‘एसआयटी’ नियुक्त

By admin | Updated: August 20, 2016 01:19 IST

औरंगाबाद : उल्कानगरी येथील श्रुती भागवत यांचा खून होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

औरंगाबाद : उल्कानगरी येथील श्रुती भागवत यांचा खून होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. श्रुती भागवत यांच्या खुनाचा तपास सीआयडी अथवा सीबीआयकडे द्यावा, यासाठी शहरातील विविध महिला संघटनांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे.उल्कानगरी येथील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) या शिक्षिकेची १८ एप्रिल २०१२ रोजी रात्री त्यांच्या फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांचे प्रेत गादीमध्ये गुंडाळून ती गादी पेटवून दिली होती. पेटलेल्या गादीच्या धुराचे लोट अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या अन्य शेजाऱ्यांच्या घरात गेल्यानंतर ते झोपेतून जागे झाले. भागवत यांच्या घरात आग लागली असावी, या शंकेने त्यांनी त्यांच्या घरात डोकावून पाहिले असता खुनाची घटना उघडकीस आली. घटनेच्या दिवशी श्रुती यांचे पती विदेशात तर मुलगा शिक्षणानिमित्त पुणे येथे होता. शांत आणि उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्कानगरीत झालेल्या या हत्येने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त संजीवकुमार यांनी युद्धपातळीवर तपास केला. मात्र मारेकऱ्यापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही. २०१२ साली महिला संघटनांनी आंदोलने केली होती. तपास सीआयडी अथवा सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाने तपास एसआयटीकडून करण्याचा निर्णय घेतला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच एसआयटी स्थापन केली आहे. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, महिला पोलीस उपनिरीक्षक भांगे आणि चार कर्मचाऱ्यांचे हे पथक आहे.ह्यएसआयटीमार्फत तपास सुरूउपायुक्त आटोळे म्हणाले की, शासनाच्या आदेशाने नुकतीच श्रुती भागवत यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीने तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेचा उलगडा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.