शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

माणसे जोडण्याचे काम अंकुशरावांनी केले

By admin | Updated: April 3, 2017 23:16 IST

वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून कर्मयोगी अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सोमवारी काढले. अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मारकाचे उद्घाटन व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, कारखान्याच्या अध्यक्षा शारदाताई टोपे, राजेश टोपे, जयदत्त क्षिरसागर, मुधकर चव्हाण, राजेंद्र शिंगणे, उद्योगपती बद्रीनारायण बारवाले, राहुल मोटे, आ. सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, डी. पी. सावंत, लक्ष्मण पवार, रामराव वडकुते, सुभाष झांबड, नारायण कुचे, कैलास गोरंट्याल, संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे, बदामराव पंडित, डोणगावकर, निसार देशमुख, सुरेश जेथलिया आदींची उपस्थिती होती.पवार म्हणाले की, आज माझ्या भावना या संमिश्र आहेत. एकीकडे सहकार्याचे स्मरण तर दुसरीकडे माझे मन अस्वस्थ आहे. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी अंकुशराव लहान होते. आम्ही पंचेचाळीस वर्षे सोबत काम केले. त्यांनी समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. सर्व कामे ही चौकटीत राहून शिस्तबध्द पद्धतीने केली. कारखाने, शैक्षणिक संस्था, दूध संघ, सुतगिरणी अशा विविध सहकारी संस्था उभारल्या. मी स्वत: सुतगिरणी चालू शकलो नाही. परंतु अंकुशराव यांनी अतिशय यशस्वीपणे सुतगिरणी चालू ठेवली. आज महाराष्ट्रात अनेक सूतगिरण्या बंद अवस्थेत आहेत. प्रतिकुल परिस्थिती असतानाही विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. त्यावेळी अण्णासाहेब उढाण, विलास खरात यांचे तगडे आव्हान होते. मत्स्योदरी शिक्षण संस्था स्थापन करून गुणवत्ताधारक विद्यार्थी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून कारखाने काढले. अशा विविध विकास कामांचा ध्यास अंकुशराव यांनी घेतला होता. अंकुशराव टोपे यांनी महाराष्ट्रात अनेक संस्थांवर विविध पदांवर काम करु न त्या संस्था उत्तमरितीने चालवल्या. त्यांनी आयुष्यभर संस्थेचे हित जोपासले. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशसह अनेक राज्यात उसाचे उत्पादन वाढल्याने महाराष्ट्रातील साखरेला उठाव नसल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा.समाधान इंगळे यांनी , तर आभार उत्तम पवार यांनी मानले.