शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

माणसे जोडण्याचे काम अंकुशरावांनी केले

By admin | Updated: April 3, 2017 23:16 IST

वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून कर्मयोगी अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सोमवारी काढले. अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मारकाचे उद्घाटन व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, कारखान्याच्या अध्यक्षा शारदाताई टोपे, राजेश टोपे, जयदत्त क्षिरसागर, मुधकर चव्हाण, राजेंद्र शिंगणे, उद्योगपती बद्रीनारायण बारवाले, राहुल मोटे, आ. सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, डी. पी. सावंत, लक्ष्मण पवार, रामराव वडकुते, सुभाष झांबड, नारायण कुचे, कैलास गोरंट्याल, संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे, बदामराव पंडित, डोणगावकर, निसार देशमुख, सुरेश जेथलिया आदींची उपस्थिती होती.पवार म्हणाले की, आज माझ्या भावना या संमिश्र आहेत. एकीकडे सहकार्याचे स्मरण तर दुसरीकडे माझे मन अस्वस्थ आहे. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी अंकुशराव लहान होते. आम्ही पंचेचाळीस वर्षे सोबत काम केले. त्यांनी समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. सर्व कामे ही चौकटीत राहून शिस्तबध्द पद्धतीने केली. कारखाने, शैक्षणिक संस्था, दूध संघ, सुतगिरणी अशा विविध सहकारी संस्था उभारल्या. मी स्वत: सुतगिरणी चालू शकलो नाही. परंतु अंकुशराव यांनी अतिशय यशस्वीपणे सुतगिरणी चालू ठेवली. आज महाराष्ट्रात अनेक सूतगिरण्या बंद अवस्थेत आहेत. प्रतिकुल परिस्थिती असतानाही विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. त्यावेळी अण्णासाहेब उढाण, विलास खरात यांचे तगडे आव्हान होते. मत्स्योदरी शिक्षण संस्था स्थापन करून गुणवत्ताधारक विद्यार्थी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून कारखाने काढले. अशा विविध विकास कामांचा ध्यास अंकुशराव यांनी घेतला होता. अंकुशराव टोपे यांनी महाराष्ट्रात अनेक संस्थांवर विविध पदांवर काम करु न त्या संस्था उत्तमरितीने चालवल्या. त्यांनी आयुष्यभर संस्थेचे हित जोपासले. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशसह अनेक राज्यात उसाचे उत्पादन वाढल्याने महाराष्ट्रातील साखरेला उठाव नसल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा.समाधान इंगळे यांनी , तर आभार उत्तम पवार यांनी मानले.