शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

माणसे जोडण्याचे काम अंकुशरावांनी केले

By admin | Updated: April 3, 2017 23:16 IST

वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

वडीगोद्री : माणसे जोडण्याचे काम करण्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून कर्मयोगी अंकुशराव टोपे यांनी साखर कारखाने काढून शेतकरी विकासाचा ध्यास घेतल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सोमवारी काढले. अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मारकाचे उद्घाटन व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, कारखान्याच्या अध्यक्षा शारदाताई टोपे, राजेश टोपे, जयदत्त क्षिरसागर, मुधकर चव्हाण, राजेंद्र शिंगणे, उद्योगपती बद्रीनारायण बारवाले, राहुल मोटे, आ. सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, डी. पी. सावंत, लक्ष्मण पवार, रामराव वडकुते, सुभाष झांबड, नारायण कुचे, कैलास गोरंट्याल, संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे, बदामराव पंडित, डोणगावकर, निसार देशमुख, सुरेश जेथलिया आदींची उपस्थिती होती.पवार म्हणाले की, आज माझ्या भावना या संमिश्र आहेत. एकीकडे सहकार्याचे स्मरण तर दुसरीकडे माझे मन अस्वस्थ आहे. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी अंकुशराव लहान होते. आम्ही पंचेचाळीस वर्षे सोबत काम केले. त्यांनी समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. सर्व कामे ही चौकटीत राहून शिस्तबध्द पद्धतीने केली. कारखाने, शैक्षणिक संस्था, दूध संघ, सुतगिरणी अशा विविध सहकारी संस्था उभारल्या. मी स्वत: सुतगिरणी चालू शकलो नाही. परंतु अंकुशराव यांनी अतिशय यशस्वीपणे सुतगिरणी चालू ठेवली. आज महाराष्ट्रात अनेक सूतगिरण्या बंद अवस्थेत आहेत. प्रतिकुल परिस्थिती असतानाही विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. त्यावेळी अण्णासाहेब उढाण, विलास खरात यांचे तगडे आव्हान होते. मत्स्योदरी शिक्षण संस्था स्थापन करून गुणवत्ताधारक विद्यार्थी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून कारखाने काढले. अशा विविध विकास कामांचा ध्यास अंकुशराव यांनी घेतला होता. अंकुशराव टोपे यांनी महाराष्ट्रात अनेक संस्थांवर विविध पदांवर काम करु न त्या संस्था उत्तमरितीने चालवल्या. त्यांनी आयुष्यभर संस्थेचे हित जोपासले. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशसह अनेक राज्यात उसाचे उत्पादन वाढल्याने महाराष्ट्रातील साखरेला उठाव नसल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा.समाधान इंगळे यांनी , तर आभार उत्तम पवार यांनी मानले.