शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कर्जासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख

By admin | Updated: November 5, 2016 01:01 IST

निलंगेकर यांची माहिती : अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार सुधारणार

विश्वास पाटील-- कोल्हापूर --अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कर्जासाठी वार्षिक उत्पन्नाची अट आता वाढवून ६ लाख रुपये करण्यात आल्याची माहिती कौशल्य व उद्योजकता विकास मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. या महामंडळाचा कारभार लोकाभिमुख करून त्यामार्फत मराठा समाजातील पाच लाख तरुणांना रोजगार पुरविण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.‘लोकमत’ने आॅक्टोबरमध्ये या महामंडळाच्या कारभाराचे वाभाडे काढणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. राज्य सरकारने त्यानुसार या महामंडळासाठी काय केले, हे विचारण्यासाठी मंत्री निलंगेकर यांच्याशी संपर्क साधला.या महामंडळातर्फे स्थापनेपासून एकच बीजभांडवल कर्ज योजना सुरूअसून, ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ४० हजार (शहरांत ५५ हजार) रुपये आहे त्यांनाच हे कर्ज मिळत होते. ग्रामीण भागात शेतमजुरालाही सरासरी १५० रुपये हजेरी मिळते. त्यामुळे एवढ्या कमी उत्पन्नाचा दाखलाच मिळत नसल्याने लाभार्थी हा पहिल्याच अटीमध्ये बसत नाही. त्यामुळे महामंडळाच्या लाभाचा दरवाजा तिथेच बंद होत होता. त्याची दखल घेऊन मंत्री निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने उत्पन्नाची अट ६ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजूर झाला असून लवकरच त्याचा शासन आदेशही निघेल, असे त्यांनी सांगितले.निलंगेकर-पाटील म्हणाले, ‘कर्ज योजनेची उत्पन्नाची अट अशी होती की, त्यामुळे एकही अर्ज मंजूरच (पान ९ वर) होणार नाही म्हणून तातडीने ती पहिल्यांदा बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या महामंडळासाठी २०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. हा निधी टप्या-टप्याने मार्चपर्यंत दिला जाईल. या महामंडळाच्या योजना आम्ही ‘मुद्रा योजने’शी जोडणार आहोत, त्यामुळे आपोआपच जाचक अटी कमी होतील. मराठा समाज मोठ्या प्रमाणावर शेतीशी निगडित आहे. आता तरुण मुले शेतीत नवे तंत्रज्ञान वापरत आहेत.त्यामुळे शेतीतील कौशल्य विकास व तंत्रज्ञान वापरासाठी या महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे.----------------सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती‘या महामंडळासाठी पूर्णवेळ सक्षम अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. मुख्यालय असो की जिल्हा स्तरावर पुरेसा कर्मचारीवर्ग दिला जाईल. कर्जप्रकरणांची संख्या वाढल्यावर आपोआप ही यंत्रणा आम्हाला उभी करावीच लागेल. त्यादृष्टीनेही आम्ही विचार सुरू केला आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तत्पर असलेले महामंडळ असे त्याचे स्वरुप असेल असा आमचा प्रयत्न आहे. स्वत: मुख्यमंत्री यांचाच हे महामंडळ सक्षम करण्यासाठी आग्रह आहे, असे मंत्री निलंगेकर यांनी सांगितले.