शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वार्षिक धान्य खरेदी अंतिम टप्प्यात पोहोचली

By admin | Updated: May 19, 2014 01:33 IST

औरंगाबाद : दरवर्षी नवीन गहू, ज्वारीची आवक फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होते. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत वार्षिक धान्य खरेदी केली जाते. यातही एप्रिल-मे महिन्यात धान्यात सर्वाधिक उलाढाल होत असते.

औरंगाबाद : दरवर्षी नवीन गहू, ज्वारीची आवक फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होते. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत वार्षिक धान्य खरेदी केली जाते. यातही एप्रिल-मे महिन्यात धान्यात सर्वाधिक उलाढाल होत असते. यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीने महाराष्ट्रातील गहू खराब झाला. जो हाती आला त्याचा रंग फिका पडला. या परिस्थितीत काही भागात अवकाळी पाऊस कमी पडल्याने तेथील गव्हाचा रंग टिकून राहिला. तसेही औरंगाबादच नव्हे तर महाराष्ट्रातील गव्हाची मागणी गेल्या २० ते २५ वर्षांपासून मध्यप्रदेश पूर्ण करीत असतो. यंदा मध्यप्रदेशातील काही भागालाही अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याने तेथील गव्हाचा रंग फिका पडला होता. यंदा गुजरात व राजस्थानमध्ये अवकाळी पाऊस न झाल्याने तेथील रंगदार व दर्जेदार गहू बाजारात आला. या गव्हाची हातोहात विक्री झाली. ग्राहकांनी मध्यप्रदेशातील महाग शरबती गव्हाऐवजी गुजरातच्या तुकडी गव्हाला अधिक पसंती दिली. गुजरातचा गहू १,८५० ते २,४५० रुपये, राजस्थानचा १,८५० ते २,२०० रुपये, तर मध्यप्रदेशातील १,४०० ते २,७०० रुपये व स्थानिक १,३०० ते २,५०० रुपये क्विंटल विकला गेला. गव्हाचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, वार्षिक गव्हाच्या एकूण विक्रीपैकी ५० टक्के गहू गुजरातमधील विक्री झाला. २० टक्के गहू मध्यप्रदेशातील, तर प्रत्येकी १५ टक्के गहू राजस्थानील व स्थानिक विक्री झाला. हंगामात बाजारपेठेत रोज सुमारे साडेतीन हजार ते ४ हजार क्विंटल गव्हाची विक्री झाली असून, गव्हात सुमारे १ कोटी रुपयांची उलाढाल झाली. बाजारपेठेत संपूर्ण देशातून तांदळाची आवक होत असते. सुमारे ७० प्रकारचा गहू बाजारात उपलब्ध होता. यंदा बासमती तांदळाने भावाचा उच्चांक गाठला आहे. ओरिजनल बासमती तांदूळ १४० ते १५० रुपये किलोने विकला जात आहे. भाववाढीने बासमतीची विक्री अवघी ५ ते १० टक्के इतकीच झाली. यंदा विदर्भातील कालीमूछ व कोलम तांदळाला ग्राहकांनी पहिली पसंती दिली. एकूण तांदळाच्या विक्रीत निम्मा तांदूळ हाच विकला गेला. कालीमूछ ५,००० ते ५,८०० रुपये, तर कोलम तांदूळ ५,००० ते ५,६०० रुपये क्विंटल विक्री झाला. तांदळाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, हंगामात शहरात रोज ५० टन तांदळाची विक्री झाली. यात २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल झाली. वार्षिक धान्य खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील महिन्यात शालेय साहित्य खरेदीकडे ग्राहक लक्ष केंद्रित करतील. यामुळे धान्य बाजारपेठेतील उठाव घटेल. धान्य वाळविण्यात अडचणी वर्षासाठी खरेदी केलेल्या गव्हाला घरात कीड लागू नये म्हणून त्याला उन्हात वाळविण्यात येते. मात्र, यंदा दुपारी कडक ऊन तर थोेड्याच वेळात ढगाळ वातावरण, तर सायंकाळी पाऊस अशा अनपेक्षित बदलांमुळे धान्य वाळविताना अडचणींना तोंड द्यावे लागले. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होते. यामुळे मे महिन्यातच वार्षिक धान्य खरेदी संपुष्टात येते.