शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

औरंगाबादेतील ऑक्सिजन निर्मिती प्लांट घोषणेपुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 03:19 IST

इतर जिल्ह्यांवर राहावे लागते अवलंबून

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी,  ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे. गतवर्षी लिक्विड ऑक्सिजन निर्मिती प्लांटची घोषणा करण्यात आली; परंतु वर्षभरातही औरंगाबादेत ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभा राहू शकला नाही. या प्लांटच्या उभारणीकडे दुर्लक्ष करून पुरवठादारांनाच एकप्रकारे ‘ऑक्सिजन’ पुरविले जात असल्याची टीका लोकप्रतिनिधींकडून होत आहे.   मराठवाड्यात गतवर्षी ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे औरंगाबादसह जालन्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारण्यात येईल, असे जाहीर करून त्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांना आवाहनही केले. पुणे, रायगड, ठाणे, नागपूर या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प असल्याने तेथून मराठवाड्यापर्यंत ऑक्सिजनच्या वाहतुकीत बराच वेळ जातो. त्यामुळे औरंगाबादच्या प्रकल्पातून महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होईल. १०० ते २०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन निर्मिती या प्रकल्पातून होईल, असे सांगण्यात आले. प्रकल्प उभारणाऱ्या काही उद्योजकांशी चर्चा करण्यात आली. त्यातील दोन उद्योजकांनी औरंगाबाद आणि जालन्याला पसंती दिली. तातडीने सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी अट उद्योजकांनी टाकली; परंतु प्रत्यक्षात पुढे काही झाले नाही. घोषणा करणाऱ्या मंत्र्यांसह प्रशासनाला या प्लांटचा विसर पडला. रुग्णालयांत ऑक्सिजन टँक उभारण्यात येत आहे. त्यात पुरवठादारांकडून लिक्विड ऑक्सिजन पुरविण्याशिवाय काहीही केले जात नसल्याने ऑक्सिजनसाठी रुग्णांचा जीव जाण्याची वेळ ओढावत असल्याची ओरड होत आहे.    पालकमंत्री घोषणा करतात; परंतु त्यानंतरही प्लांट झालेला नाही. याला कोणीतरी जबाबदार आहे की नाही. जो ऑक्सिजन पुरवितो, त्याचे काही प्रेशर आहे का? हा प्लांट झाल्यास सर्व शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविता येईल. वाहतुकीत वेळ जाणार नाही. अधिक पैसेही मोजावे लागणार नाही.      - इम्तियाज जलील, खासदार