शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अग्रिम राशीची घोषणा, हा शासनाचा प्रसिद्धी स्टंट

By admin | Updated: July 10, 2017 00:48 IST

शेंद्रा :औरंगाबाद तालुक्यात प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याला १० हजारांच्या अग्रिम राशीचा लाभ झाला नाही

श्रीकांत पोफळे । लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : शासनाने खरिपाच्या पेरणीसाठी तातडीने दहा हजारांचे कर्ज उपलब्ध करून दिल्याची घोषणा कर्जमाफीप्रसंगी केली. कृषिमंत्र्यांनी तर ज्या बँका शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्ज तात्काळ देणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची भाषा वापरली होती. औरंगाबाद तालुक्यात प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याला १० हजारांच्या अग्रिम राशीचा लाभ झाला नाही. बँकांनाही स्पष्ट आदेश नसल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांतही गोंधळाची अवस्था आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपामुळे अखेर सरकारला झुकावे लागले. खरीप पेरणीची वेळ लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी दहा हजार रुपये अग्रिम स्वरूपात देण्याची घोषणा करण्यात आली; परंतु नियोजन न करता घेतलेला निर्णय फक्त प्रसिद्धीसाठीचा स्टंट ठरला. खरीप पेरणीला बियाणे व खत खरेदी करण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सरकारने ही घोषणा केली असावी, असे वाटून शेतकरी काहीअंशी सुखावला अन् क्षणात पुन्हा दुखावला. कारण बँकेत अनेक खेट्या मारूनदेखील त्याच्या पदरी निराशाच पडली आहे. तात्काळ कर्जाच्या चौकशीला आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला परत पाठवल्याचे चित्र औरंगाबाद तालुक्यातील प्रत्येक बँकेत बघायला मिळाले. अगोदर चार वर्षे दुष्काळ नंतर नोटाबंदीने शेतीमालाचे घसरलेले भाव, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात होताच, खरिपाच्या पेरणीसाठी दहा हजारांची मदत ही खरोखरच आवश्यक होती. या घोषणेने बँकेत शेतकऱ्यांची संख्या वाढली; परंतु बँक अधिकारी, कर्मचारी १० हजारांविषयी काहीही माहिती देऊ शकले नाही. बँकांसमोर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बँकांनाही स्पष्ट आदेशाची गरज होती. तो आदेश शासनाकडून लेखी स्वरूपात एकाही बँकेला पोहोचला नाही. त्यामुळे बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना काय उत्तरे द्यावीत असा प्रश्न अधिकाऱ्यांना सतावतो आहे. तर बँका कर्ज देत नसल्यामुळे शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत. एखाद्या बँक अधिकाऱ्याला खरोखरच शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्ज वितरित करायचे असल्यास कशा प्रकारे हे कर्ज द्यावे, याचे उत्तर कुठल्याच बँकेकडे नव्हते. त्यामुळे हा निर्णय कशासाठी घेतला हे कोडे अजूनही शेतकरी व बँक अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अनुत्तरित राहिला.