शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अग्रिम राशीची घोषणा, हा शासनाचा प्रसिद्धी स्टंट

By admin | Updated: July 10, 2017 00:48 IST

शेंद्रा :औरंगाबाद तालुक्यात प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याला १० हजारांच्या अग्रिम राशीचा लाभ झाला नाही

श्रीकांत पोफळे । लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : शासनाने खरिपाच्या पेरणीसाठी तातडीने दहा हजारांचे कर्ज उपलब्ध करून दिल्याची घोषणा कर्जमाफीप्रसंगी केली. कृषिमंत्र्यांनी तर ज्या बँका शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्ज तात्काळ देणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची भाषा वापरली होती. औरंगाबाद तालुक्यात प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याला १० हजारांच्या अग्रिम राशीचा लाभ झाला नाही. बँकांनाही स्पष्ट आदेश नसल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांतही गोंधळाची अवस्था आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपामुळे अखेर सरकारला झुकावे लागले. खरीप पेरणीची वेळ लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी दहा हजार रुपये अग्रिम स्वरूपात देण्याची घोषणा करण्यात आली; परंतु नियोजन न करता घेतलेला निर्णय फक्त प्रसिद्धीसाठीचा स्टंट ठरला. खरीप पेरणीला बियाणे व खत खरेदी करण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सरकारने ही घोषणा केली असावी, असे वाटून शेतकरी काहीअंशी सुखावला अन् क्षणात पुन्हा दुखावला. कारण बँकेत अनेक खेट्या मारूनदेखील त्याच्या पदरी निराशाच पडली आहे. तात्काळ कर्जाच्या चौकशीला आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला परत पाठवल्याचे चित्र औरंगाबाद तालुक्यातील प्रत्येक बँकेत बघायला मिळाले. अगोदर चार वर्षे दुष्काळ नंतर नोटाबंदीने शेतीमालाचे घसरलेले भाव, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात होताच, खरिपाच्या पेरणीसाठी दहा हजारांची मदत ही खरोखरच आवश्यक होती. या घोषणेने बँकेत शेतकऱ्यांची संख्या वाढली; परंतु बँक अधिकारी, कर्मचारी १० हजारांविषयी काहीही माहिती देऊ शकले नाही. बँकांसमोर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बँकांनाही स्पष्ट आदेशाची गरज होती. तो आदेश शासनाकडून लेखी स्वरूपात एकाही बँकेला पोहोचला नाही. त्यामुळे बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना काय उत्तरे द्यावीत असा प्रश्न अधिकाऱ्यांना सतावतो आहे. तर बँका कर्ज देत नसल्यामुळे शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत. एखाद्या बँक अधिकाऱ्याला खरोखरच शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्ज वितरित करायचे असल्यास कशा प्रकारे हे कर्ज द्यावे, याचे उत्तर कुठल्याच बँकेकडे नव्हते. त्यामुळे हा निर्णय कशासाठी घेतला हे कोडे अजूनही शेतकरी व बँक अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अनुत्तरित राहिला.