शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

जायकवाडी-जालना योजनेस वर्षपूर्ती

By admin | Updated: May 7, 2014 00:25 IST

गंगाराम आढाव , जालना गेल्यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळासह टंचाईच्या स्थितीत संपूर्ण जालनेकरांना दिलासा देणार्‍या जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनेस बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे.

गंगाराम आढाव , जालना गेल्यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळासह टंचाईच्या स्थितीत संपूर्ण जालनेकरांना दिलासा देणार्‍या जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनेस बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून जायकवाडी -जालना पाणी पुरवठा योजना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर व अनंत अडचनीवर मात करीत पूर्ण झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे,माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्यासह आ. कैलास गोरंट्याल यांचे योजना मार्गी लागण्यासाठीचे विशेष प्रयत्न पूर्ततेसाठी कारणीभूत ठरले. ७ मे २०१३ रोजी या योजनाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या लोकार्पण सोहळ्यास बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या जिल्ह्यात गेल्या वर्षी भीषण दुष्काळ पडला होता. विशेषत: शहरासह जिल्ह्यातील सर्व पाणीसाठे कोरडेठाक पडले होते. जमिनील पाणी पातळीही पूर्णत: खालावली. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात भीषण टंचाई उद्भवली. जालना शहरवासियांनी तर फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईच्या झळा सोसल्या. महिनोन्महिने पाणीपुरवठा न झाल्याने जालनेकर पाण्याने व्याकुळ बनले होते. या स्थितीत जालनेकरांनी मोठ्या यातना भोगल्या. पिण्यासह सांडपाण्यासाठी जालनेकरांना दररोज पैसे मोजावे लागले. श्रीमंतापासून ते गोरगरिबांनाही खरेदी केल्यावर पाण्यावरच तहान भागवावी लागली. या स्थितीत अख्खा उन्हाळा कसा काढावा या विवंचनेत सापडलेल्या जालनेकरांनी जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनाच एकमेव आशादायी होती. परंतु या योजनेचे हे काम रखडल्याने पाणी मिळेल की नाही अशी भीती निर्माण झाली. परंतु आ. कैलास गोरंट्याल यांनी आंदोलनाचा मार्ग पत्कारुन सरकारी दरबारी दबाव आणला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेतील अडथळे दूर करीत योजना युद्ध पातळीवर कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. अखेर रखडत का असेलना या योजनेचे पाणी ७ मे रोजी जालनापर्यंत पोहचले. मुख्यमंत्री चव्हाण व उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकापर्ण सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे संपर्क नेते तथा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह अन्य उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी हा ऐतिहासिक क्षण उल्लेख करीत जालनेकरांच्या दारात आलेले पाणी घरा- घरात पोहोचण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी करीता मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासन पाळलेसुद्धा मुख्यमंत्री निधीतून ७ कोटी ६४ लाख रुपयांपैकी २ कोटी ८४ लाख २८ हजार रुपयांचा निधी अंतर्गत जलवाहिनीसाठी प्राप्त झाला. त्यातून शहरातील ३८ वस्त्यामधील अंतर्गत जलवाहिनीचे काम करण्यात येत आहे. त्यातील काही कामे पूर्ण झाली आहे तर काही बाकी आहेत. जायकवाडी - जालना या योजनेतून शहरापर्यंत पाणी पोहोचल्यानंतर जालनावासियांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या भीषण टंचाईच्या स्थितीत त्याचे महत्त्व अनन्य साधारण होते. यावर्षी तेवढ्या तीव्रतेने टंचाईच्या झळा पोहोचल्या नाहीत. जायकवाडी- जालना योजना त्यास कारणीभूत आहे. त्याचबरोबर यावर्षी पडलेल्या समाधानकारक पावसासह घाणेवाडीसह इतर अन्य प्रकल्पांतील पुरेसा पाणीसाठा तसेच जमिनीतील पाणी पातळीतील वाढही साह्यभूत ठरली आहे. त्यामुळे मागील वर्षा इतकी भीषण टंचाई यावर्षी त्या तुलनेत जाणवत नाही हे वास्तव आहे. आनंद व नाराजी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जालनेकराच्या दारात आलेले पाणी घरा- घरात पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अंतर्गत जलवाहिन्यांसाठी २ कोटी ८४ लक्ष रूपयाचा निधी सुद्धा दिला. वर्ष होत असतानाही अनेक ठिकाणच्या जलवाहिन्यांचे काम झालेले नाही. तसेच पालिकेच्या नियोजना अभावी जालनेकरांना पाण्यासाठी १५ - १५ दिवसाची वाट पाहावी लागत आहे. पाणी असून ही महिन्यातून दोन वेळा पाणी देण्यात असल्याने जालनेकरात पाणी दारात आल्याचा आनंद आहे. मात्र घरात येत नसल्याने नाराजी आहे.