शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अण्णा भाऊंनी दिले जगण्याचे बळ

By admin | Updated: August 1, 2014 00:29 IST

जालना : आपल्या साहित्यातून उपेक्षित माणसातील नायक आणि नायिकांना जगासमोर आणून त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून देणारे अण्णा भाऊ साठे हे जगण्याचे व्यक्तिमत्त्व आहे, अ

जालना : आपल्या साहित्यातून उपेक्षित माणसातील नायक आणि नायिकांना जगासमोर आणून त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून देणारे अण्णा भाऊ साठे हे जगण्याचे व्यक्तिमत्त्व आहे, असे प्रतिपादन बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले यांनी येथे केले.जालना येथील लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आयेशा खान तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाबाई लोंढे, प्रमोद खरात, विजय पवार आदींची उपस्थिती होती.यावेळी आपले विचार मांडताना तोकले म्हणाल्या की, अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका व स्त्री पात्रे ही कणखर आहेत. संघर्षशील आहेत. आशावादी आहेत. अण्णा भाऊ साठे साहित्याची समीक्षा ही देशाचे स्वातंत्र्य स्त्रियांचे शील व पुरूषांचा स्वाभिमान या तीन महत्त्वाच्या निकषावर करावे लागते. कारण महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आशय त्यांच्या साहित्यातून अभिव्यक्त झालेला आहे. धर्म आणि पुरूषसत्ताक संस्कृतीने महिलांच्या जगण्यावर अनेक बंधने घातली, सासर आणि माहेर यांच्या प्रतिष्ठेपायी तिच्यावर होणारे अन्याय-अत्याचार स्त्री निमूटपणे सहन करते. मात्र सर्व समानता असणाऱ्या विधवा, परितक्ता, तरूण महिलाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड कसे करायचे ? हे अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातील बंडखोर नायिकांच्या रूपाने दाखवून दिले आहे. अण्णा भाऊंच्या कथा, कादंबऱ्यातील स्त्री दर्शन वेगळे असे वाटते कारण ते सत्य वर्णन आहे. अन्यायाविरोधात संघर्ष करणारी स्त्री अण्णा भाऊंनी रेखाटली आहे. अण्णा भाऊंचे सामाजिक विचार तसेच परिवर्तनवादी विचार आत्मसात करण्याची आज नितांत गरज आहे. अण्णा भाऊंचे साहित्य व त्यांचे सामाजिक जीवन हे जगण्याचे व्यक्तिमत्व आहे, असे त्या म्हणाल्या.यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या आयेशा खान यांनी परिवर्तनवादी विचार पेरण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्त्यांनी करणे गरजचे असून, विचारमाला तसेच विचारमंथनातूनच सामाजिक परिवर्तन घडू शकेल. उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी सामाजिक चळवळी गतिमान करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाबाई लोंढे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खरात यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी व्याख्यानमालेच्या वतीने अ‍ॅड.संजीव देशपांडे, रंजना भाले, अशोक घोडे, लक्ष्मी चांदोडे, मिलींद सावंत, प्रशांत आढाव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अ‍ॅड.बी.एम.साळवे, सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगातिवरे, अ‍ॅड.कैलास रत्नपारखे, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, प्रशांत नवगिरे, बबनराव कसबे, हरेश रत्नपारखे, किरण सिरसाठ, शेख इब्राहीम, गणेश चांदोडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व महिला यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)साहित्य दर्जेदार अण्णा भाऊ साठे साहित्याची समीक्षा ही देशाचे स्वातंत्र्य, स्त्रियांचे शील व पुरूषांचा स्वाभिमान या तीन महत्त्वाच्या निकषांवर करावे लागते. कारण महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आशय त्यांच्या साहित्यातून अभिव्यक्त झालेला आहे.