शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

अंकित भारत अ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 19:09 IST

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याची २३ जानेवारीपासून इंग्लंड लॉन्सविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या ...

ठळक मुद्देइंग्लंड लॉन्सविरुद्ध मालिका : चौथ्या, पाचव्या वनडेत भूषवणार नेतृत्व

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याची २३ जानेवारीपासून इंग्लंड लॉन्सविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. पहिल्या तीन सामन्यांत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असणारा अजिंक्य रहाणे भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. त्याचप्रमाणे ऋषभ पंत याची अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघात निवड झाली आहे.बीसीसीआयच्या सिनिअर निवड समितीने इंग्लंड लॉयन्सविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी शनिवारी संघाची घोषणा केली.आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सुरेख कामगिरी करणारा पंत याला दौºयावर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आले नव्हते; परंतु तो वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. महाराष्ट्र रणजी संघाचा कर्णधार अंकित बावणे हा २९ व ३१ जानेवारी रोजी होणाºया चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवील. या अखेरच्या दोन सामन्यांत ऋषभ पंत भारत अ संघाकडून खेळणार आहे. त्यानंतर ऋषभ ६ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाºया टी-२0 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करील.इंग्लंड लॉयन्सविरुद्ध सुरुवातीच्या तीन सामन्यांत रहाणेच्या नेतृत्वाखाली निवडण्यात येणाºया संघात अंकित बावणे, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर यांनादेखील स्थान मिळाले आहे. पंत याच्याशिवाय कृणाल पांड्या यालादेखील न्यूझीलंडमध्ये होणाºया टी-२0 मालिकेआधी सरावाची संधी मिळेल. संघाची निवड देशांतर्गत सामन्यातील कामगिरीच्या आधारावर करण्यात आली आहे. त्यात रणजी करंडकात उपांत्य फेरीत पोहोचणाºया चारही संघांतील खेळाडूंना निवडण्यात आलेले नाही.पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवली जाईल. त्यानंतर दोन चारदिवसीय सामन्यांची मालिकाही ७ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.वनडे मालिकेसाठी भारत अ संघपहिल्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अनमोलप्रीतसिंह, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, अंकित बावणे, इशान किशन (यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, अक्षर पटेल, मयंक मार्कंडेय, जयंत यादव, सिद्धार्थ कौल, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर, नवदीप सैनी.चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अंकित बावणे (कर्णधार), अनमोलप्रीतसिंह, ऋतुराज गायकवाड, रिकी भुई, सिद्धेश लाड, हिंमतसिंह, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, राहुल चाहर, जयंत यादव, नवदीप सैनी, आवेश खान, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर.दोनदिवसीय सराव सामन्यासाठी बोर्ड एकादश संघ : इशान किशन (कर्णधार), अक्षत रेड्डी, ध्रुव शोरे, रिकी भुई, सिद्धेश लाड, रिंकू सिंह, प्रियम गर्ग, सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, अनिकेत चौधरी, अंकित राजपूत, राजेश मोहंती.