शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भारतातील उच्चशिक्षण गंभीर अवस्थेत- अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:56 IST

जागतिक स्पर्धेच्या तुलनेत भारतातील उच्चशिक्षण मोडकळीस आले आहे. गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणात आभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत उच्चशिक्षणात बदल होत नाहीत. आता उच्चशिक्षणाची पुनर्रचनाच करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक स्पर्धेच्या तुलनेत भारतातील उच्चशिक्षण मोडकळीस आले आहे. गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणात आभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत उच्चशिक्षणात बदल होत नाहीत. आता उच्चशिक्षणाची पुनर्रचनाच करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत सोहळा मंगळवारी (दि.१५) नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते, तर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्यासह अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. दीक्षांत सोहळ्यात मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर यांनी उच्चशिक्षणातील दुरवस्था मांडली. देशात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २४ टक्के एवढे आहे. यात ३ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांसाठी आवघे १४ लाख शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात. यातील ९० टक्के विद्यार्थी, शिक्षक हे खाजगी शिक्षण संस्थांतील आहेत. यातही ग्रामीण आणि शहरी भागातील उच्चशिक्षणात मोठी तफावत आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची वानवा आढळते. याचा परिणाम देशात ‘क्लासेस’ (शिकवणी) हा उद्योग म्हणून पुढे आला आहे. ४.२ लाख कोटी रुपयांची उलाढाल या उद्योगात होते. त्याचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) तब्बल ४.१ टक्के एवढा मोठा वाटा असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. त्यातुलनेत उच्चशिक्षणातील गुणवत्ता जागतिक स्पर्धेत अत्यंत खालच्या दर्जाची आहे. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याचे प्रमाण मोठे आहे. देशात तब्बल २५ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे एकूण भीषण स्वरूप असून, उच्चशिक्षणाची पुनर्रचना करावी लागणार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. समाधान इंगळे यांनी करून दिला.मोजक्याच शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तादेशात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालयांची निर्मिती झाली आहे. यातील काहीच शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळते. बाकी ठिकाणी आनंदीआनंद आहे. अशाच संस्थांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते कमी होत आहे.अधुनिक युगात जगाशी स्पर्धा करण्यासाठी शिक्षकांना अधिक प्रभावीपणे काम करीत युवकांना दर्जेदार शिक्षण द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र