शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील उच्चशिक्षण गंभीर अवस्थेत- अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:56 IST

जागतिक स्पर्धेच्या तुलनेत भारतातील उच्चशिक्षण मोडकळीस आले आहे. गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणात आभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत उच्चशिक्षणात बदल होत नाहीत. आता उच्चशिक्षणाची पुनर्रचनाच करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक स्पर्धेच्या तुलनेत भारतातील उच्चशिक्षण मोडकळीस आले आहे. गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणात आभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत उच्चशिक्षणात बदल होत नाहीत. आता उच्चशिक्षणाची पुनर्रचनाच करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत सोहळा मंगळवारी (दि.१५) नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते, तर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्यासह अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. दीक्षांत सोहळ्यात मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर यांनी उच्चशिक्षणातील दुरवस्था मांडली. देशात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २४ टक्के एवढे आहे. यात ३ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांसाठी आवघे १४ लाख शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात. यातील ९० टक्के विद्यार्थी, शिक्षक हे खाजगी शिक्षण संस्थांतील आहेत. यातही ग्रामीण आणि शहरी भागातील उच्चशिक्षणात मोठी तफावत आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची वानवा आढळते. याचा परिणाम देशात ‘क्लासेस’ (शिकवणी) हा उद्योग म्हणून पुढे आला आहे. ४.२ लाख कोटी रुपयांची उलाढाल या उद्योगात होते. त्याचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) तब्बल ४.१ टक्के एवढा मोठा वाटा असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. त्यातुलनेत उच्चशिक्षणातील गुणवत्ता जागतिक स्पर्धेत अत्यंत खालच्या दर्जाची आहे. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याचे प्रमाण मोठे आहे. देशात तब्बल २५ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे एकूण भीषण स्वरूप असून, उच्चशिक्षणाची पुनर्रचना करावी लागणार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. समाधान इंगळे यांनी करून दिला.मोजक्याच शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तादेशात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालयांची निर्मिती झाली आहे. यातील काहीच शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळते. बाकी ठिकाणी आनंदीआनंद आहे. अशाच संस्थांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते कमी होत आहे.अधुनिक युगात जगाशी स्पर्धा करण्यासाठी शिक्षकांना अधिक प्रभावीपणे काम करीत युवकांना दर्जेदार शिक्षण द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र