शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाडेवाढीविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया

By admin | Updated: May 29, 2014 00:40 IST

जालना : राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात १ जूनपासून २.५० टक्के केलेल्या भाडेवाढीने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जालना : राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात १ जूनपासून २.५० टक्के केलेल्या भाडेवाढीने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या दीड-दोन वर्षात इंधनाचे दर भडकल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही तीनदा प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली. आताही डिझेलचे दर वाढल्याचे व दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचे कारण दाखवून महामंडळाने २.५० टक्के भाववाढीचा प्रस्ताव तयार केला. त्यास राज्य मंत्रिमंडळानेसुद्धा हिरवा कंदील दाखवला. १ जूनपासून नवीन भाडेवाढ लागू होणार असून, त्यामुळे लांब पल्ल्यासह सर्व बसेसच्या भाडे दरात मोठी वाढ होणार आहे. या दरवाढीचा ग्रामस्थांना मोठा तडाखा बसणार आहे. त्यामुळेच प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुळात प्रवाशांकरिता फारशा सोयी-सुविधा पुरविलेल्या नाहीत. अनेक मार्गांवर मोठी गर्दी असतांनासुद्धा बसेस सोडल्या जात नाहीत. ग्रामीण भागातील अनेक बसेसच्या फेर्‍या बंद केल्या. याउलट महामार्गांवर बसेस तैनात करून, महामंडळाने ग्रामस्थांची चेष्टा चालविली आहे. ‘गाव तेथे एसटी’ असा नारा देऊनही आज ग्रामीण भागात २५ टक्के गावांमधून बसेस धावत नाहीत, असा सूर प्रवाशांतून उमटत आहे. (प्रतिनिधी) परिवहन महामंडळाच्या दरवाढीमुळेच आता खाजगी प्रवासी वाहतुकीस मोठे बळ मिळेल, अशी भीती जाणकारांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात बसेसच्या फेर्‍या मुळातच कमी झाल्या आहेत. त्याचा फटकाही महामंडळास बसला असून, आता दरवाढीमुळे एसटीस फटका बसेल, असा अंदाज आहे. रेल्वेच्या एक्सप्रेससह पॅसेंजर गाड्यांच्या तिकिटांचे दर एसटीच्या तुलनेत अल्प आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गांवरील शहरांसह गावांमधून एसटीकडे पाठ फिरवून प्रवाशांनी रेल्वेव्दारेच प्रवासास पसंती दिली आहे. परंतु रेल्वे मार्गाव्यतिरिक्त शहरांसह गावांमधून एसटीशिवाय पर्याय नाही, नाईलाजाने एसटीकडे वळावे लागते, अशी खंत अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.