शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

भाडेवाढीविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया

By admin | Updated: May 29, 2014 00:40 IST

जालना : राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात १ जूनपासून २.५० टक्के केलेल्या भाडेवाढीने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जालना : राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात १ जूनपासून २.५० टक्के केलेल्या भाडेवाढीने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या दीड-दोन वर्षात इंधनाचे दर भडकल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही तीनदा प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली. आताही डिझेलचे दर वाढल्याचे व दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचे कारण दाखवून महामंडळाने २.५० टक्के भाववाढीचा प्रस्ताव तयार केला. त्यास राज्य मंत्रिमंडळानेसुद्धा हिरवा कंदील दाखवला. १ जूनपासून नवीन भाडेवाढ लागू होणार असून, त्यामुळे लांब पल्ल्यासह सर्व बसेसच्या भाडे दरात मोठी वाढ होणार आहे. या दरवाढीचा ग्रामस्थांना मोठा तडाखा बसणार आहे. त्यामुळेच प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुळात प्रवाशांकरिता फारशा सोयी-सुविधा पुरविलेल्या नाहीत. अनेक मार्गांवर मोठी गर्दी असतांनासुद्धा बसेस सोडल्या जात नाहीत. ग्रामीण भागातील अनेक बसेसच्या फेर्‍या बंद केल्या. याउलट महामार्गांवर बसेस तैनात करून, महामंडळाने ग्रामस्थांची चेष्टा चालविली आहे. ‘गाव तेथे एसटी’ असा नारा देऊनही आज ग्रामीण भागात २५ टक्के गावांमधून बसेस धावत नाहीत, असा सूर प्रवाशांतून उमटत आहे. (प्रतिनिधी) परिवहन महामंडळाच्या दरवाढीमुळेच आता खाजगी प्रवासी वाहतुकीस मोठे बळ मिळेल, अशी भीती जाणकारांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात बसेसच्या फेर्‍या मुळातच कमी झाल्या आहेत. त्याचा फटकाही महामंडळास बसला असून, आता दरवाढीमुळे एसटीस फटका बसेल, असा अंदाज आहे. रेल्वेच्या एक्सप्रेससह पॅसेंजर गाड्यांच्या तिकिटांचे दर एसटीच्या तुलनेत अल्प आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गांवरील शहरांसह गावांमधून एसटीकडे पाठ फिरवून प्रवाशांनी रेल्वेव्दारेच प्रवासास पसंती दिली आहे. परंतु रेल्वे मार्गाव्यतिरिक्त शहरांसह गावांमधून एसटीशिवाय पर्याय नाही, नाईलाजाने एसटीकडे वळावे लागते, अशी खंत अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.