शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त प्रवाशांनी बसस्थानकाचे लावले गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 00:22 IST

जालना: तब्बल तीन तास प्रतीक्षा करूनही बस सोडण्यात आली नाही.

जालना: तब्बल तीन तास प्रतीक्षा करूनही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त प्रवांशानी गुरूवारी रात्री जालना बसस्थानकाचे मुख्यप्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. तासभर आंदोलन केल्याने बस स्थानकात येणाऱ्या व येथून जाणाऱ्या बसेस खोळंबल्या होत्या. त्यामुळे बसस्थानक व बाहेर रस्त्यावर भोकरदननाकापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.जालना तालुक्यात सेवली, सरकटे वझर येथे मुक्कामी जाणारी बस जालना स्थानकातून सायंकाळी ५.१५ वाजता सोडण्यात येते. तसेच जालना- घनसावंगी ही घनसावंगीला मुक्कामी जाणारी बस सायंकाळी ६. १५ वाजता जालना येथून सोडण्यात येते. या दोन्ही बसेस शेवटची असल्याने दोन्ही ठिकाणच्या रस्त्यावरील सुमारे २५ गावांतील शंभर ते दीडशे प्रवासी व काही विद्यार्थी, विद्यार्थिनी जालना स्थानकात या बसेसची वाट पाहत बसले होते. मात्र या दोन्ही ठिकाणी जालन्याहून परत त्या त्या गावाला जाणाऱ्या दोन्ही बसेस रस्त्यातच नादुरूस्त झाल्या होत्या.घनसावंगीकडून जालन्याकडे येणारी बस क्रमांक १९३३ ही तळेगाव (ता. घनसावंगी ) जवळ नादुरूस्त झाली. तर सेवली, वझर सरकटे कडून येणारी बस नेर गावा जवळ नादूरूस्त झाली होती. या दोन्ही बसची वाट पाहत जालना स्थानकात बसलेल्या प्रवाशांनी दीड तास प्रतिक्षेनंतर अगोदर रात्री ७ वाजता डेपोतून स्थानकात प्रवेशासाठी असलेले गेट लावले. मात्र तरीही आगारप्रमुख व वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने रात्री ९ च्या सुमारास स्थानकाचे गेट लावून सर्व प्रवाशी गेटवर बसले होते. त्यामुळे बस स्थानकात येणाऱ्या व स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसची वाहतूक ठप्प झाली होती. साडेनऊ वाजेच्या सुमारास भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवींद्र राऊत, मयूर ठाकूर, रवि कटारे आदींनी एसटीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोलून तात्काळ दोन्ही ठिकाणच्या बसेसचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच प्रवाशीही संतप्त झाले होते. दोन्ही बस लागत नाही. तोपर्यंत गेट उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. अखेर रात्री ९.५० वाजता अगोदर सेवली बस नतर १० वाजता घनसावंगी बस सोडण्यात आली. दरम्यान, मुक्कामी बसेस जालना स्थानकातून कधीच वेळेवर सोडण्यात येत नाही. सोडल्यातरी खटाऱ्या बसेस असतात त्या रस्त्यातच बंद पडून प्रवाशांची गैरसोय होते. आज तसेच झाले असल्याचे राजेंद्र कोटेचा,अनिल मुंडे, संगीता खराडे, शंकर पंडीत, सोमनाथ घायाळ, राजेंद्र जाधव, गोपाल ढेंगळे, उद्धव थोरात, गजानन नरवडे, भगवान जाधव, नानाभाऊ जाधव, गंगू ठेंगडे, चंद्रशेखर कारेगावकर,अन्नू तांबोळी या प्रवाशांनी सांगितले. (प्रतिनिधी)