शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

संतप्त प्रवाशांनी बसस्थानकाचे लावले गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 00:22 IST

जालना: तब्बल तीन तास प्रतीक्षा करूनही बस सोडण्यात आली नाही.

जालना: तब्बल तीन तास प्रतीक्षा करूनही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त प्रवांशानी गुरूवारी रात्री जालना बसस्थानकाचे मुख्यप्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. तासभर आंदोलन केल्याने बस स्थानकात येणाऱ्या व येथून जाणाऱ्या बसेस खोळंबल्या होत्या. त्यामुळे बसस्थानक व बाहेर रस्त्यावर भोकरदननाकापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.जालना तालुक्यात सेवली, सरकटे वझर येथे मुक्कामी जाणारी बस जालना स्थानकातून सायंकाळी ५.१५ वाजता सोडण्यात येते. तसेच जालना- घनसावंगी ही घनसावंगीला मुक्कामी जाणारी बस सायंकाळी ६. १५ वाजता जालना येथून सोडण्यात येते. या दोन्ही बसेस शेवटची असल्याने दोन्ही ठिकाणच्या रस्त्यावरील सुमारे २५ गावांतील शंभर ते दीडशे प्रवासी व काही विद्यार्थी, विद्यार्थिनी जालना स्थानकात या बसेसची वाट पाहत बसले होते. मात्र या दोन्ही ठिकाणी जालन्याहून परत त्या त्या गावाला जाणाऱ्या दोन्ही बसेस रस्त्यातच नादुरूस्त झाल्या होत्या.घनसावंगीकडून जालन्याकडे येणारी बस क्रमांक १९३३ ही तळेगाव (ता. घनसावंगी ) जवळ नादुरूस्त झाली. तर सेवली, वझर सरकटे कडून येणारी बस नेर गावा जवळ नादूरूस्त झाली होती. या दोन्ही बसची वाट पाहत जालना स्थानकात बसलेल्या प्रवाशांनी दीड तास प्रतिक्षेनंतर अगोदर रात्री ७ वाजता डेपोतून स्थानकात प्रवेशासाठी असलेले गेट लावले. मात्र तरीही आगारप्रमुख व वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने रात्री ९ च्या सुमारास स्थानकाचे गेट लावून सर्व प्रवाशी गेटवर बसले होते. त्यामुळे बस स्थानकात येणाऱ्या व स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसची वाहतूक ठप्प झाली होती. साडेनऊ वाजेच्या सुमारास भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवींद्र राऊत, मयूर ठाकूर, रवि कटारे आदींनी एसटीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोलून तात्काळ दोन्ही ठिकाणच्या बसेसचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच प्रवाशीही संतप्त झाले होते. दोन्ही बस लागत नाही. तोपर्यंत गेट उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. अखेर रात्री ९.५० वाजता अगोदर सेवली बस नतर १० वाजता घनसावंगी बस सोडण्यात आली. दरम्यान, मुक्कामी बसेस जालना स्थानकातून कधीच वेळेवर सोडण्यात येत नाही. सोडल्यातरी खटाऱ्या बसेस असतात त्या रस्त्यातच बंद पडून प्रवाशांची गैरसोय होते. आज तसेच झाले असल्याचे राजेंद्र कोटेचा,अनिल मुंडे, संगीता खराडे, शंकर पंडीत, सोमनाथ घायाळ, राजेंद्र जाधव, गोपाल ढेंगळे, उद्धव थोरात, गजानन नरवडे, भगवान जाधव, नानाभाऊ जाधव, गंगू ठेंगडे, चंद्रशेखर कारेगावकर,अन्नू तांबोळी या प्रवाशांनी सांगितले. (प्रतिनिधी)