शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

अंमलबजावणीत ढिसाळपणाबद्दल नाराजी

By admin | Updated: November 15, 2016 00:35 IST

उस्मानाबाद : शासनाने हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे देशातील काळा पैसा निश्चितपणे बाहेर येईल, असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे.

उस्मानाबाद : शासनाने हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे देशातील काळा पैसा निश्चितपणे बाहेर येईल, असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे. मात्र हा निर्णय घेताना पुरेशा उपाययोजना केल्या नाहीत असे त्यांचे म्हणणे असून, प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आल्याची व्यथा तब्बल ७१ टक्के नागरिकांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.शासनाने मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत जिल्हावासीयांना नेमके काय वाटते? हे लोकमतने जाणून घेतले असता तब्बल ९० टक्क्यांहून अधिक लोकांनी शासनाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले असून, या निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल, अवैध व्यवसायांना चाप बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे; मात्र त्याचवेळी या निर्णयानंतर शासनाने आवश्यक पाऊले उचलून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी होती. ती दक्षता मात्र घेतली गेली नसल्याचे तब्बल ७१ टक्के नागरिकांनी म्हटले आहे. याच अनुषंगाने हा निर्णय घेताना शासनाने पुरेशा उपाययोजना केल्या आहेत असे वाटते काय? असे विचारले असता केवळ २९ टक्के नागरिकांनी होय, काही प्रमाणात उपाययोजना केल्या असल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारावर टाच आली आहे का? असेही यावेळी विचारण्यात आले होते. त्यावर ९२ टक्के नागरिकांनी होय, दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर केवळ ८ टक्के नागरिकांनी सदर निर्णयानंतरही आमचे दैनंदिन व्यवहार सुरळीत असल्याचे म्हटले आहे. मोठ्या नोटाबंदीच्या निर्णयाचे तात्काळ परिणाम दिसतील का? विशेषत: उस्मानाबादसह जिल्ह्यातील अनेक भागात सध्या पालिका निवडणुका सुरू आहेत, तर काही ठिकाणी विधानपरिषदेची रणधुमाळी सुरू आहे. या निर्णयामुळे या निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशाच्या गैरवापराला आळा बसेल का? असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत थेट नागरिकांना बोलते केले असता ते काहीसे संभ्रमात असल्याचे दिसून आले. केवळ ५१ टक्के नागरिकांनीच होय, सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत शासनाच्या या निर्णयामुळे गैरप्रकारांना आळा बसलेला दिसेल असा विश्वास व्यक्त केला, तर ४९ टक्के नागरिकांनी मात्र सदर निर्णयामुळे निवडणुकीतील पैशांच्या गैरव्यवहारावर कसलाही अंकुश बसणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)