शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंमलबजावणीत ढिसाळपणाबद्दल नाराजी

By admin | Updated: November 15, 2016 00:35 IST

उस्मानाबाद : शासनाने हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे देशातील काळा पैसा निश्चितपणे बाहेर येईल, असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे.

उस्मानाबाद : शासनाने हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे देशातील काळा पैसा निश्चितपणे बाहेर येईल, असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे. मात्र हा निर्णय घेताना पुरेशा उपाययोजना केल्या नाहीत असे त्यांचे म्हणणे असून, प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आल्याची व्यथा तब्बल ७१ टक्के नागरिकांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.शासनाने मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत जिल्हावासीयांना नेमके काय वाटते? हे लोकमतने जाणून घेतले असता तब्बल ९० टक्क्यांहून अधिक लोकांनी शासनाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले असून, या निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल, अवैध व्यवसायांना चाप बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे; मात्र त्याचवेळी या निर्णयानंतर शासनाने आवश्यक पाऊले उचलून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी होती. ती दक्षता मात्र घेतली गेली नसल्याचे तब्बल ७१ टक्के नागरिकांनी म्हटले आहे. याच अनुषंगाने हा निर्णय घेताना शासनाने पुरेशा उपाययोजना केल्या आहेत असे वाटते काय? असे विचारले असता केवळ २९ टक्के नागरिकांनी होय, काही प्रमाणात उपाययोजना केल्या असल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारावर टाच आली आहे का? असेही यावेळी विचारण्यात आले होते. त्यावर ९२ टक्के नागरिकांनी होय, दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर केवळ ८ टक्के नागरिकांनी सदर निर्णयानंतरही आमचे दैनंदिन व्यवहार सुरळीत असल्याचे म्हटले आहे. मोठ्या नोटाबंदीच्या निर्णयाचे तात्काळ परिणाम दिसतील का? विशेषत: उस्मानाबादसह जिल्ह्यातील अनेक भागात सध्या पालिका निवडणुका सुरू आहेत, तर काही ठिकाणी विधानपरिषदेची रणधुमाळी सुरू आहे. या निर्णयामुळे या निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशाच्या गैरवापराला आळा बसेल का? असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत थेट नागरिकांना बोलते केले असता ते काहीसे संभ्रमात असल्याचे दिसून आले. केवळ ५१ टक्के नागरिकांनीच होय, सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत शासनाच्या या निर्णयामुळे गैरप्रकारांना आळा बसलेला दिसेल असा विश्वास व्यक्त केला, तर ४९ टक्के नागरिकांनी मात्र सदर निर्णयामुळे निवडणुकीतील पैशांच्या गैरव्यवहारावर कसलाही अंकुश बसणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)