शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

अंमलबजावणीत ढिसाळपणाबद्दल नाराजी

By admin | Updated: November 15, 2016 00:35 IST

उस्मानाबाद : शासनाने हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे देशातील काळा पैसा निश्चितपणे बाहेर येईल, असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे.

उस्मानाबाद : शासनाने हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे देशातील काळा पैसा निश्चितपणे बाहेर येईल, असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे. मात्र हा निर्णय घेताना पुरेशा उपाययोजना केल्या नाहीत असे त्यांचे म्हणणे असून, प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आल्याची व्यथा तब्बल ७१ टक्के नागरिकांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.शासनाने मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत जिल्हावासीयांना नेमके काय वाटते? हे लोकमतने जाणून घेतले असता तब्बल ९० टक्क्यांहून अधिक लोकांनी शासनाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले असून, या निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल, अवैध व्यवसायांना चाप बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे; मात्र त्याचवेळी या निर्णयानंतर शासनाने आवश्यक पाऊले उचलून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी होती. ती दक्षता मात्र घेतली गेली नसल्याचे तब्बल ७१ टक्के नागरिकांनी म्हटले आहे. याच अनुषंगाने हा निर्णय घेताना शासनाने पुरेशा उपाययोजना केल्या आहेत असे वाटते काय? असे विचारले असता केवळ २९ टक्के नागरिकांनी होय, काही प्रमाणात उपाययोजना केल्या असल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारावर टाच आली आहे का? असेही यावेळी विचारण्यात आले होते. त्यावर ९२ टक्के नागरिकांनी होय, दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर केवळ ८ टक्के नागरिकांनी सदर निर्णयानंतरही आमचे दैनंदिन व्यवहार सुरळीत असल्याचे म्हटले आहे. मोठ्या नोटाबंदीच्या निर्णयाचे तात्काळ परिणाम दिसतील का? विशेषत: उस्मानाबादसह जिल्ह्यातील अनेक भागात सध्या पालिका निवडणुका सुरू आहेत, तर काही ठिकाणी विधानपरिषदेची रणधुमाळी सुरू आहे. या निर्णयामुळे या निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशाच्या गैरवापराला आळा बसेल का? असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत थेट नागरिकांना बोलते केले असता ते काहीसे संभ्रमात असल्याचे दिसून आले. केवळ ५१ टक्के नागरिकांनीच होय, सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत शासनाच्या या निर्णयामुळे गैरप्रकारांना आळा बसलेला दिसेल असा विश्वास व्यक्त केला, तर ४९ टक्के नागरिकांनी मात्र सदर निर्णयामुळे निवडणुकीतील पैशांच्या गैरव्यवहारावर कसलाही अंकुश बसणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)