शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

जलस्वराज्यतील ‘त्या’ रकमेची वसुली होणार

By admin | Updated: September 20, 2014 00:03 IST

हिंगोली : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलस्वराज्य अभियानात अनेक गावांतील कामे अपूर्ण राहिली.

हिंगोली : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलस्वराज्य अभियानात अनेक गावांतील कामे अपूर्ण राहिली. शिवाय कामांच्या तपासणीत मूल्यांकनापेक्षा अधिक रक्कम समित्यांनी उचलली असल्याचे निदर्शनास आले होते. ती भरण्यास सांगूनही अनेकांनी त्यास प्रतिसाद दिला नसल्याने ही प्रकरणे आरआरसीकडे वर्ग करण्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे.जलस्वराज्य अभियान जवळपास दीडशे ते दोनशे गावांत राबविण्यात आले होेते. बोटावर मोजण्याइतक्याच गावांनी यात चांगले काम करून दाखविले. अनेक गावांमध्ये वाढीव अंदाजपत्रकांपासून ते निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यापर्यंत सर्वच बाबतीत खाबूगिरीचाच मार्ग अवलंबण्यात आला होता. त्यामुळे या योजनेत पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे जाण्याचे प्रमाण कमी होते. अंतिम टप्प्यात केवळ दिखाव्यासाठी अनेक योजना पूर्ण झाल्याचे चित्र उभे केले गेले. काहीतर कागदावरच उभ्या राहिल्या. या एकंदर प्रकाराची चौकशी झाल्यानंतर अनेकांनी मूल्यांकनात आपले कसब दाखविले अन् कारवाईपासून बचाव केला. मात्र काहींना ते जमले नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १.१५ कोटी रुपयांची वसुली विविध पाणीपुरवठा समित्यांकडे निघाली होती. त्यापैकी ५९.७५ लाख रुपयांची वसुली अजूनही संबंधितांकडून होणे बाकी आहे. अशा ४३ गावांतील संबंधित यंत्रणेकडून वसुलीसाठी ही प्रकरणे आरआरसीकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे जि.प.चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार यांनी सांगितले. याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्याकडे एक बैठक झाली होती. त्यात त्यांनी वरीलप्रकारच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत.