शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

अतिवृष्टीनंतर सभेत शब्दवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:23 IST

नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची तक्रार सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या तहकूब सर्वसाधारण सभेत केली. या गंभीर प्रश्नावर पदाधिकारी व प्रशासनाने कोणतेच गांभीर्य दाखविले नाही, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण शहराची दाणादाण उडाली आहे. घर पडून आणि पुरात वाहून गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. ५० पेक्षा अधिक वसाहतींमध्ये आजही रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहेत. त्यात भरीस भर म्हणून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले ओहत. नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची तक्रार सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या तहकूब सर्वसाधारण सभेत केली. या गंभीर प्रश्नावर पदाधिकारी व प्रशासनाने कोणतेच गांभीर्य दाखविले नाही, हे विशेष.१९ आॅगस्ट रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत वंदेमातरमच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. त्यामुळे महापौर बापू घडामोडे यांनी तहकूब सभा सोमवारी आयोजित केली होती. सभा सुरू होताच सर्वच पक्षांच्या नगरसेवक, नगरसेविकांनी अतिवृष्टीचा मुद्या उपस्थित केला. जयभवानीनगर, टाऊन हॉल परिसरातील नूर कॉलनीच्या नाल्याशेजारी राहणाºया नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार करण्यात आली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणे दोन दिवसांत काढण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. नूर कॉलनीची पाहणी आयुक्त, शहर अभियंता यांनी करून अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश महापौरांनी दिले.