शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

आंबेडकर भवन बचाव; शहरात उत्स्फूर्त मोर्चा

By admin | Updated: June 26, 2017 00:52 IST

औरंगाबाद आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना अटक झालीच पाहिजे या व अन्य मागण्यांसाठी रविवारी औरंगाबादेत मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असलेले दादर येथील आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना अटक झालीच पाहिजे, तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संपूर्ण कामकाजाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, या व अन्य मागण्यांसाठी रविवारी औरंगाबादेत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा निघण्यापूर्वी पावसाच्या शिडकाव्याने मोर्चेकऱ्यांचे स्वागत केले. हातात निळे, लाल व पंचशील झेंडे घेऊन भर पावसातही कार्यकर्ते बाबासाहेबांचा जयघोष करीत मोर्चात सहभागी होत होते.दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या घटनेला आज २५ जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. यासंदर्भात तक्रार दाखल असतानादेखील पोलिसांनी आजपर्यंत दोषींवर कारवाई केलेली नाही. या निषेधार्थ भारिप- बहुजन महासंघ व डाव्या परिवर्तनवादी पक्ष- संघटनांच्या वतीने रविवारी औरंगाबादेत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारिप- बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, लाल निशाण पक्ष, पँथर्स सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन, मराठवाडा लेबर युनियन, आॅल इंडिया युथ फेडरेशन आदींसह समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. अ‍ॅड. बी. एच. गायकवाड यांच्या हस्ते क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. विद्रोही जलसा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गायलेली क्रांती गीते हेच मोर्चाचे आकर्षण ठरले. रत्नाकर गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांचे समूह चौकाचौकातून मोर्चात सहभागी होत होते.