शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

आंबेडकर भवन बचाव; शहरात उत्स्फूर्त मोर्चा

By admin | Updated: June 26, 2017 00:52 IST

औरंगाबाद आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना अटक झालीच पाहिजे या व अन्य मागण्यांसाठी रविवारी औरंगाबादेत मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असलेले दादर येथील आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना अटक झालीच पाहिजे, तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संपूर्ण कामकाजाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, या व अन्य मागण्यांसाठी रविवारी औरंगाबादेत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा निघण्यापूर्वी पावसाच्या शिडकाव्याने मोर्चेकऱ्यांचे स्वागत केले. हातात निळे, लाल व पंचशील झेंडे घेऊन भर पावसातही कार्यकर्ते बाबासाहेबांचा जयघोष करीत मोर्चात सहभागी होत होते.दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या घटनेला आज २५ जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. यासंदर्भात तक्रार दाखल असतानादेखील पोलिसांनी आजपर्यंत दोषींवर कारवाई केलेली नाही. या निषेधार्थ भारिप- बहुजन महासंघ व डाव्या परिवर्तनवादी पक्ष- संघटनांच्या वतीने रविवारी औरंगाबादेत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारिप- बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, लाल निशाण पक्ष, पँथर्स सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन, मराठवाडा लेबर युनियन, आॅल इंडिया युथ फेडरेशन आदींसह समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. अ‍ॅड. बी. एच. गायकवाड यांच्या हस्ते क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. विद्रोही जलसा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गायलेली क्रांती गीते हेच मोर्चाचे आकर्षण ठरले. रत्नाकर गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांचे समूह चौकाचौकातून मोर्चात सहभागी होत होते.