शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

Video : म्हणून शिवसेना आमदाराने रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, पोलीसही धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 09:33 IST

औरंगाबाद - सोमवारपासून दुपारी चारनंतर बाजारपेठ बंद होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकताच नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. दुपारी अडीच ...

औरंगाबाद - सोमवारपासून दुपारी चारनंतर बाजारपेठ बंद होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकताच नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास जालना रोडवर दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे वाहतूक मंदावली होती. क्रांतिचौकात वाहतूक शाखेच्या हवालदार सुजाता खरात आणि अन्य एक हवालदार वाहतूक नियमन करीत होते. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहनचालक हॉर्न वाजवित होते.

क्रांतिचौकाच्या चारही रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचवेळी तेथून जाणारे आ. दानवे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेत वाहतूक नियमन सुरू केले. दरम्यान, याचवेळी एक रिक्षाचालक नियम मोडून सुसाट जाऊ लागला. तेव्हा दानवे आणि कार्यकर्त्यांनी रिक्षा रोखली. सर्व वाहनचालक सिग्नलवर उभे असताना तू असा कसा निघाला, असे विचारत त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली. यावेळी त्याने काहीतरी कारण सांगितले. त्याच्यामुळे पुन्हा वाहतूक खोळंबण्याची शक्यता पाहून त्यांनी यापुढे नियमभंग करू नको, असे बजावत त्याला जाऊ दिले. काही वेळात चौकातील वाहतूक सुरळीत सुरू झाली.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेtraffic policeवाहतूक पोलीस