शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

डिजीटल इंडियापर्यंत आलो तरी सातबारा ऑनलाईन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:05 IST

विकास राऊत औरंगाबाद : ‘शायनिंग इंडिया’ असे ब्रीद असलेल्या सरकारच्या काळात ई-सातबाऱ्याची झालेली सुरुवात सध्या डिजीटल इंडियाचे ब्रीद असलेल्या ...

विकास राऊत

औरंगाबाद : ‘शायनिंग इंडिया’ असे ब्रीद असलेल्या सरकारच्या काळात ई-सातबाऱ्याची झालेली सुरुवात सध्या डिजीटल इंडियाचे ब्रीद असलेल्या सरकारच्या काळात येऊन थांबली आहे. अद्याप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातबाराची ऑनलाईन सुविधा मिळत नसल्यामुळे २० साल बाद देखील ऑफलाईनवरच शेतीशी निगडित कामे करावी लागत आहेत.

२००१ मध्ये डिजीटल सातबारा करण्याची घोषणा झाल्यानंतर त्याची टप्पेनिहाय सुरुवात झाली. २० वर्षांचा हा डिजीटल प्रवास ‘डिजीटल इंडिया’पर्यंत येऊन थांबला आहे. अजूनही सातबारा ऑनलाईन करण्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. तलाठी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वाद होत असून, यामध्ये शेतकऱ्यांना संतापातून प्राण गमवावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

महसूल यंत्रणेतील ज्या घटकावर हा ऑनलाईनचा डाव मांडला, त्या तलाठ्याला २१ वर्षांत इंटरनेट, लॅपटॉपसारख्या सुविधा शासनाने पूर्णत: दिल्याच नाहीत शिवाय एनआयसीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचे वेळोवेळी प्रशिक्षणही दिले नाही तसेच सर्व्हर डाऊन होत असल्याने कोणतेही काम गतीने होत नाहीत.

सुरुवातीला एनआयसीने ऑनलाईन सातबाऱ्यासाठी बनविलेले सॉफ्टवेअर जमीन महसूल अधिनियमांचा अभ्यास न करता इतर सॉफ्टवेअरप्रमाणे गणिती सूत्रांवर तयार केले. ऑनलाईन सातबारा अपलोड करण्यासाठी सातबाऱ्यातील गट, मालकी, वहिवाट, जमिनीचे प्रकार, एनए, कृषक, भूसंपादन आणि आरक्षण या घटकांचा विचारच सॉफ्टवेअरमध्ये केला नव्हता. महसूल सेवेशी संबंध नसलेल्या तज्ज्ञांनी ते सॉफ्टवेअर बनविले. तक्रारी सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती आणली किंवा ते अपडेट केले गेले.

अनेक अडचणींचा सामना करावा लागतो

पाच ते सहा तासांत एक ते दोन सातबारे मंजूर होत आहेत. डिजीटल सातबाऱ्याचे काम पूर्णपणे झालेले नाही. सर्व सुविधा ऑनलाईन मिळत असताना, सातबारा अजूनही ऑनलाईन मिळण्यात अडचणी येत आहेत. शेतकरी आणि तलाठ्यांमध्ये रोज वाद होत आहेत. १५ दिवसांपासून सर्व्हरच्या साईटचा बट्ट्याबोळ झाला आहे. परिणामी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांतील सातबारा ऑनलाईन करण्याचे काम मंदावले आहे, असे जिल्हा तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.

जिल्ह्यात ६ लाख शेतकरी आहेत

जिल्ह्यात ६ लाख शेतकरी, तर ४०० च्या आसपास तलाठी आहेत. २० मिनिटांपेक्षा जास्तीचा कालावधी एक सातबारा अपलोड होण्यासाठी लागतो. त्यामुळे दिवसभराच्या कामकाजात २० पेक्षा जास्त सातबारे ऑनलाईन अपलोड होत नाहीत. दरम्यान, डिजीटल सातबाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यातील एक ते दोन तालुके आणि मंडलवगळता बहुतांश ठिकाणचे काम पूर्ण होत आल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला.