शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

डिजीटल इंडियापर्यंत आलो तरी सातबारा ऑनलाईन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:05 IST

विकास राऊत औरंगाबाद : ‘शायनिंग इंडिया’ असे ब्रीद असलेल्या सरकारच्या काळात ई-सातबाऱ्याची झालेली सुरुवात सध्या डिजीटल इंडियाचे ब्रीद असलेल्या ...

विकास राऊत

औरंगाबाद : ‘शायनिंग इंडिया’ असे ब्रीद असलेल्या सरकारच्या काळात ई-सातबाऱ्याची झालेली सुरुवात सध्या डिजीटल इंडियाचे ब्रीद असलेल्या सरकारच्या काळात येऊन थांबली आहे. अद्याप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातबाराची ऑनलाईन सुविधा मिळत नसल्यामुळे २० साल बाद देखील ऑफलाईनवरच शेतीशी निगडित कामे करावी लागत आहेत.

२००१ मध्ये डिजीटल सातबारा करण्याची घोषणा झाल्यानंतर त्याची टप्पेनिहाय सुरुवात झाली. २० वर्षांचा हा डिजीटल प्रवास ‘डिजीटल इंडिया’पर्यंत येऊन थांबला आहे. अजूनही सातबारा ऑनलाईन करण्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. तलाठी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वाद होत असून, यामध्ये शेतकऱ्यांना संतापातून प्राण गमवावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

महसूल यंत्रणेतील ज्या घटकावर हा ऑनलाईनचा डाव मांडला, त्या तलाठ्याला २१ वर्षांत इंटरनेट, लॅपटॉपसारख्या सुविधा शासनाने पूर्णत: दिल्याच नाहीत शिवाय एनआयसीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचे वेळोवेळी प्रशिक्षणही दिले नाही तसेच सर्व्हर डाऊन होत असल्याने कोणतेही काम गतीने होत नाहीत.

सुरुवातीला एनआयसीने ऑनलाईन सातबाऱ्यासाठी बनविलेले सॉफ्टवेअर जमीन महसूल अधिनियमांचा अभ्यास न करता इतर सॉफ्टवेअरप्रमाणे गणिती सूत्रांवर तयार केले. ऑनलाईन सातबारा अपलोड करण्यासाठी सातबाऱ्यातील गट, मालकी, वहिवाट, जमिनीचे प्रकार, एनए, कृषक, भूसंपादन आणि आरक्षण या घटकांचा विचारच सॉफ्टवेअरमध्ये केला नव्हता. महसूल सेवेशी संबंध नसलेल्या तज्ज्ञांनी ते सॉफ्टवेअर बनविले. तक्रारी सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती आणली किंवा ते अपडेट केले गेले.

अनेक अडचणींचा सामना करावा लागतो

पाच ते सहा तासांत एक ते दोन सातबारे मंजूर होत आहेत. डिजीटल सातबाऱ्याचे काम पूर्णपणे झालेले नाही. सर्व सुविधा ऑनलाईन मिळत असताना, सातबारा अजूनही ऑनलाईन मिळण्यात अडचणी येत आहेत. शेतकरी आणि तलाठ्यांमध्ये रोज वाद होत आहेत. १५ दिवसांपासून सर्व्हरच्या साईटचा बट्ट्याबोळ झाला आहे. परिणामी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांतील सातबारा ऑनलाईन करण्याचे काम मंदावले आहे, असे जिल्हा तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.

जिल्ह्यात ६ लाख शेतकरी आहेत

जिल्ह्यात ६ लाख शेतकरी, तर ४०० च्या आसपास तलाठी आहेत. २० मिनिटांपेक्षा जास्तीचा कालावधी एक सातबारा अपलोड होण्यासाठी लागतो. त्यामुळे दिवसभराच्या कामकाजात २० पेक्षा जास्त सातबारे ऑनलाईन अपलोड होत नाहीत. दरम्यान, डिजीटल सातबाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यातील एक ते दोन तालुके आणि मंडलवगळता बहुतांश ठिकाणचे काम पूर्ण होत आल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला.