शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

अकरावी प्रवेश यंदा ऑफलाईन तरी, सीईटीमुळे ग्रामीणकडे ओढ्याची शक्यता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:02 IST

योगेश पायघन औरंगाबाद : दहावीचा निकाल लागला. निकालानंतर तिसऱ्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. यावर्षी ग्रामीण भागासह ...

योगेश पायघन

औरंगाबाद : दहावीचा निकाल लागला. निकालानंतर तिसऱ्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. यावर्षी ग्रामीण भागासह जिल्ह्यातील प्रवेश ऑफलाईनच होणार आहेत. मात्र, अकरावी सीईटी देणाऱ्यांना प्रवेशात प्रथम प्राधान्य असणार आहे. त्यानंतर सीईटी न देणाऱ्यांना प्रवेश दिला जावा, अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन झाली तर सीईटीत वेळ घालवण्यापेक्षा ग्रामीण भागात प्रवेशाकडे विद्यार्थी वळण्याची शक्यता अधिक आहे.

महाविद्यालये, संस्थाचालक, लोकप्रतिनिधींनी आग्रहाने शहरातील ऑनलाईन प्रक्रियेतून सुटकारा मिळवला. आता सीईटीनंतर प्रवेश प्रक्रिया होणार आहे, तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी स्पष्ट केले आहे. आधी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जावेत, अशा सूचनाही अकरावी प्रवेशाबाबत देण्यात आल्या आहेत. ऑफलाईन सीईटीसाठी सोमवारपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. नामांकित महाविद्यालयांत सीईटी द्यावीच लागणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील अस्पष्ट सूचनांमुळे ग्रामीण भागातील प्रवेशामध्ये गोंंधळाची शक्यता आहे.

प्राविण्य श्रेणी म्हणजे ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार, तर प्रथम श्रेणीत ११ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. त्यामुळे गुणांच्या आधारे अनुदानित शाखांत प्रवेशासाठी चुरस होणार आहे. सीईटीतील विद्यार्थ्यांसाठी कोटा निश्चितीही होण्याची शक्यता महाविद्यालयांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अकरावीचा वर्ग असलेली शाळा, कनिष्ठ महाविद्यालये -११६

जिल्ह्यातील एकूण जागा -७२,८६०

शहरातील अकरावी वर्ग असलेल्या संस्था -११६

शहरातील प्रवेश क्षमता-३,१४७०

गेल्या वर्षी ऑनलाईन अर्ज- २६,७५५

ऑनलाईन प्रत्यक्ष प्रवेश - १६,८२५

रिक्त जागा -१४,६४५

---

अकरावीसाठी गावांत प्रवेश का?

---

काॅलेजमध्ये न जाता केवळ परीक्षांपुरते जाता यावे. उपस्थितीची अट नसते. शिवाय परीक्षेच्या वेळीही महाविद्यालयांकडून विशेष ‘सहकार्य’ करण्याची काही महाविद्यालयांकडून खात्री दिली जाते. ग्रामीणमध्ये प्रवेश घेऊन शहरात क्लासेस करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळताना दिसतात. त्यामुळे अकरावी, बारावीच्या वर्गातील उपस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

----

म्हणून घेतला गावांत प्रवेश

---

गावाशेजारी महाविद्यालय आहे. तिथे अकरावीत प्रवेश घेऊन इथे शहरात कोचिंग क्लासेस करणार आहे. त्यामुळे अकरावी सीईटीत वेळ घालवणार नाही. नीट परीक्षेची तयारीही करायची आहे. परीक्षेवेळी गावाकडे जाऊन परीक्षा देईन. अभ्यासाला शहरात रुम घेऊन सुरुवात केली आहे.

-प्रतीक देवकर, विद्यार्थी,

----

गावातल्या शाळेतच अकरावी, बारावीचे वर्ग आहेत. इथेही नियमित वर्ग भरतात. त्यामुळे गावातच प्रवेश घेतला आहे. शहरात राहून शिकण्यावर खूप खर्च होणार. तो करणे पालकांना शक्य होणार नाही. सोबतच्या मैत्रिणीही गावातच प्रवेश घेणार आहेत.

-आकांक्षा सपकाळ, विद्यार्थिनी

---

प्रवेश ऑफलाईन पण सीईटीनंतर

----

यावर्षी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरी सीईटी देणाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे सध्या केवळ नोंदणी सुरू केली आहे.

शिक्षण उपसंचालकांनी अकरावी सीईटीचा निकाल लागल्यावर प्रवेश निश्चिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सीईटीनंतर मेरीटलिस्ट लावून प्रवेश निश्चिती करू.

-रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय

----

अद्याप शासनाच्या स्पष्ट सूचना नाहीत. अकरावी सीईटीनंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन असली तरी ग्रामीणकडे ओढा असेल. सीईटी बंधनकारक हवी होती. विद्यार्थ्यांसाठी ते योग्य झाले असते. विद्यार्थ्यांकडून विचारपूस सुरू झाली आहे. प्रवेश समिती त्यांची नावे नोंदवून घेत पुढील सूचना आल्यावर काॅलबॅक करून कळवतील.

-बालाजी नागतिलक, प्राचार्य, स. भु. विद्यान महाविद्यालय