शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश यंदा ऑफलाईन तरी, सीईटीमुळे ग्रामीणकडे ओढ्याची शक्यता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:02 IST

योगेश पायघन औरंगाबाद : दहावीचा निकाल लागला. निकालानंतर तिसऱ्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. यावर्षी ग्रामीण भागासह ...

योगेश पायघन

औरंगाबाद : दहावीचा निकाल लागला. निकालानंतर तिसऱ्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. यावर्षी ग्रामीण भागासह जिल्ह्यातील प्रवेश ऑफलाईनच होणार आहेत. मात्र, अकरावी सीईटी देणाऱ्यांना प्रवेशात प्रथम प्राधान्य असणार आहे. त्यानंतर सीईटी न देणाऱ्यांना प्रवेश दिला जावा, अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन झाली तर सीईटीत वेळ घालवण्यापेक्षा ग्रामीण भागात प्रवेशाकडे विद्यार्थी वळण्याची शक्यता अधिक आहे.

महाविद्यालये, संस्थाचालक, लोकप्रतिनिधींनी आग्रहाने शहरातील ऑनलाईन प्रक्रियेतून सुटकारा मिळवला. आता सीईटीनंतर प्रवेश प्रक्रिया होणार आहे, तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी स्पष्ट केले आहे. आधी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जावेत, अशा सूचनाही अकरावी प्रवेशाबाबत देण्यात आल्या आहेत. ऑफलाईन सीईटीसाठी सोमवारपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. नामांकित महाविद्यालयांत सीईटी द्यावीच लागणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील अस्पष्ट सूचनांमुळे ग्रामीण भागातील प्रवेशामध्ये गोंंधळाची शक्यता आहे.

प्राविण्य श्रेणी म्हणजे ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार, तर प्रथम श्रेणीत ११ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. त्यामुळे गुणांच्या आधारे अनुदानित शाखांत प्रवेशासाठी चुरस होणार आहे. सीईटीतील विद्यार्थ्यांसाठी कोटा निश्चितीही होण्याची शक्यता महाविद्यालयांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अकरावीचा वर्ग असलेली शाळा, कनिष्ठ महाविद्यालये -११६

जिल्ह्यातील एकूण जागा -७२,८६०

शहरातील अकरावी वर्ग असलेल्या संस्था -११६

शहरातील प्रवेश क्षमता-३,१४७०

गेल्या वर्षी ऑनलाईन अर्ज- २६,७५५

ऑनलाईन प्रत्यक्ष प्रवेश - १६,८२५

रिक्त जागा -१४,६४५

---

अकरावीसाठी गावांत प्रवेश का?

---

काॅलेजमध्ये न जाता केवळ परीक्षांपुरते जाता यावे. उपस्थितीची अट नसते. शिवाय परीक्षेच्या वेळीही महाविद्यालयांकडून विशेष ‘सहकार्य’ करण्याची काही महाविद्यालयांकडून खात्री दिली जाते. ग्रामीणमध्ये प्रवेश घेऊन शहरात क्लासेस करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळताना दिसतात. त्यामुळे अकरावी, बारावीच्या वर्गातील उपस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

----

म्हणून घेतला गावांत प्रवेश

---

गावाशेजारी महाविद्यालय आहे. तिथे अकरावीत प्रवेश घेऊन इथे शहरात कोचिंग क्लासेस करणार आहे. त्यामुळे अकरावी सीईटीत वेळ घालवणार नाही. नीट परीक्षेची तयारीही करायची आहे. परीक्षेवेळी गावाकडे जाऊन परीक्षा देईन. अभ्यासाला शहरात रुम घेऊन सुरुवात केली आहे.

-प्रतीक देवकर, विद्यार्थी,

----

गावातल्या शाळेतच अकरावी, बारावीचे वर्ग आहेत. इथेही नियमित वर्ग भरतात. त्यामुळे गावातच प्रवेश घेतला आहे. शहरात राहून शिकण्यावर खूप खर्च होणार. तो करणे पालकांना शक्य होणार नाही. सोबतच्या मैत्रिणीही गावातच प्रवेश घेणार आहेत.

-आकांक्षा सपकाळ, विद्यार्थिनी

---

प्रवेश ऑफलाईन पण सीईटीनंतर

----

यावर्षी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरी सीईटी देणाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे सध्या केवळ नोंदणी सुरू केली आहे.

शिक्षण उपसंचालकांनी अकरावी सीईटीचा निकाल लागल्यावर प्रवेश निश्चिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सीईटीनंतर मेरीटलिस्ट लावून प्रवेश निश्चिती करू.

-रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय

----

अद्याप शासनाच्या स्पष्ट सूचना नाहीत. अकरावी सीईटीनंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन असली तरी ग्रामीणकडे ओढा असेल. सीईटी बंधनकारक हवी होती. विद्यार्थ्यांसाठी ते योग्य झाले असते. विद्यार्थ्यांकडून विचारपूस सुरू झाली आहे. प्रवेश समिती त्यांची नावे नोंदवून घेत पुढील सूचना आल्यावर काॅलबॅक करून कळवतील.

-बालाजी नागतिलक, प्राचार्य, स. भु. विद्यान महाविद्यालय