शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

डीसीसीतून होणार खरीप अनुदानाचे वाटप

By admin | Updated: January 22, 2015 00:44 IST

शिरीष शिंदे , बीड खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५८ शांखामधून वाटप होणार आहे. डीसीसीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष

शिरीष शिंदे , बीडखरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५८ शांखामधून वाटप होणार आहे. डीसीसीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करुन राज्य शासनास पाठविले होते. जिल्ह्यासाठी एकुण १४४ कोटी रुपये मिळाले आहेत. दरम्यान, डीसीसी बँकेतून अवैधरित्या कर्ज वितरीत केल्याचे प्रकार समोर आल्यानंतर पोलीस, नियोजन यासह महत्वाची खाती बँकेतून काढण्यात आली होती. त्यामुळे बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाला होता. बँकेतून खाती निघून गेली व वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे काही ठिकाणच्या शाखा काही कालावधीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. प्रशासकपदी मुकणे यांची नियुक्ती केल्यानंतर जुन्या थकबाकीदारांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले. नऊ संस्थाच्या प्रॉपर्टीसाठीचे डिक्री प्रमाणपत्रही डीडीसीला मिळाले होते मात्र, कोणतीही कारवाई झाली नव्हती. वळवलेली खाती पुन्हा डीसीसीत परत आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक व्यवस्थापक व इरत वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करीत आहेत. डीसीसीमधून आर्थिक व्यवहार झाले तर बँक पुन्हा पूर्वपदावर येईल अशातला भाग नाही. पैशाचे आदान-प्रदान झाले तर त्याचा काहीसा लाभ बँकेला होईल. तसेच बँकेला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या सात ते दहा दिवसांच्या ठेवी करुन राष्ट्रीयकृत बँकेत ठेवल्या तर त्याचे व्याज बँकेला मिळेल असा हेतू आहे.खरीप हंगाम नुकसान भरपाईची १४४ कोटी रुपयांची रक्कम अद्याप डीसीसीकडे जमा झाली नाही. तहसीलदारांमार्फत शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. कोणाला किती निधी द्यायचा हे यादीमध्ये असणार आहे. याद्या अंतिम केल्यानंतर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे डीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कदम यांनी सांगितले. ४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक पदी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. घाम गाळून मिळविलेला पैसा शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी बँकेत टाकला होता मात्र हा पैसा आजही मिळेनासा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप थकबाकीदारांवर कारवाईचा फास आवळला नसल्याने वसुली अद्यापही थंडच आहे़