शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

१८३ कोटींचे वाटप बाकी

By admin | Updated: August 20, 2016 00:55 IST

शिरीष शिंदे , बीड सन २०१५-१६ या वर्षी शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा मंजूर होऊन जिल्ह्याला मिळाला; मात्र दोन महिने उलटूनही प्रमुख चार बँकांमार्फत पीक विम्याचे

शिरीष शिंदे , बीडसन २०१५-१६ या वर्षी शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा मंजूर होऊन जिल्ह्याला मिळाला; मात्र दोन महिने उलटूनही प्रमुख चार बँकांमार्फत पीक विम्याचे १८३ कोटी ७० लाख रुपये वाटप होणे बाकी असल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. आतापर्यंत ७०८ कोटी ८१ लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. गतवर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला होता. अत्यल्प पावसात पीक पेरणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक हाती येईल की नाही, याबद्दल साशंकता होती. त्यामुळे अनेकांनी प्राधान्याने पीक विमा भरला होता. नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स या शासनाच्या अधीन असलेल्या कंपनीने शेतकऱ्यांचा पीक विमा विविध बँकांतून भरून घेतला होता. जिल्ह्यातील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच पीक विमा मंजूर करण्यात आला होता.जिल्ह्यातील ११ लाख ४७ हजार ७०० शेतकऱ्यांना तब्बल ८९२ कोटी ९७ लाख ९४ हजार एवढा मोठा पीक विमा मंजूर झाला होता. परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या तुलनेत बीडचा पीक विमा सर्वांत जास्त होता. एरवी पीक विमा मंजूर होईल की नाही, अशी शक्यता असते; मात्र दुष्काळाच्या अनुषंगाने पीक विमा मंजूर केला गेला.जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्वाधिक पीक विमा भरला गेला होता. त्यापाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्यापाठोपाठ एसबीआय. एसबीएचच्या शाखांमध्ये पीक विमा भरला गेला होता. मात्र, डीसीसी बँकेमार्फत पीक विमा रक्कम वाटप होणे बाकी आहे. वंचित शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने बँकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.