शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

डीपीडीसीनेही दुर्लक्ष केल्याचा आरोप

By admin | Updated: July 1, 2014 00:37 IST

श्रीक्षेत्र माहूर: नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने तालुका आजपर्यंत विकासात्मक बाबीत मागासलेला राहिला़ त्यात जिल्हा नियोजन समितीने शहरातील विकासात्मक

श्रीक्षेत्र माहूर: नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने तालुका आजपर्यंत विकासात्मक बाबीत मागासलेला राहिला़ त्यात जिल्हा नियोजन समितीने शहरातील विकासात्मक कामांबाबत दखल न घेतल्याने तालुक्याच्या मागासलेपणात भर पडत आहे़शहरात वर्षभरात कोट्यवधी भाविक भक्त पर्यटकांची सतत वर्दळ असते़ तालुक्यात व शहरात एकमेव असलेल्या बसस्थानकात पाच एकर जागा असूनही दर्शनी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स, अद्ययावत बसस्थानक, प्रतीक्षालय इत्यादी सुविधा देण्याची अनेक वर्षापासूनच्या मागणीला आदिवासी उपाय योजनेतून ५० लाख रुपये सुशोभिकरणातून देवून बोळवण करण्यात आली आहे़ तसेच येथील म़रा़ वि़म़ कंपनी कार्यालयाकडेही ६ एकर जागा आहे़ या कार्यालयाच्या दर्शनी भागात रेणुका देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून मोठी जागा शिल्लक असल्याने येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स, कर्मचारी निवासस्ािने अद्ययावत कार्यालय तसेच प्रवासी निवारा बांधून देण्याचीही मागणी फार जुनी असूनही याकडे जिल्हा नियोजन समितीने सतत दुर्लक्ष केले़ तालुक्यात आदिवासी व बंजारा समाजाचे प्रमाण जास्त असूनही आदिवासींच्या मुलामुलींच्या शिक्षण रोजगारासाठी एकही शाळा, वसतिगृह किंवा उद्योग प्रशिक्षण यासाठी आजपर्यंत एकही इमारत सुद्धा बांधण्यात आली नाही़ तसेच बंजारा समाजाच्या मुला-मुलींसाठी एकही वसतिगृह किंवा उद्योगासाठी प्रशिक्षणकेंद्र सुरू करण्यात आलेले नाही़माजी मुख्यमंत्री तथा खा़ अशोकराव चव्हाण हे जिल्ह्याचे खरे भूमिपूत्र व येथील देवस्थानाबद्दल आस्था तर परिसरातील जनतेच्या समस्या समजून घेणारे दूरदृष्टी असणारे लोकनेते असल्याने त्यांनी तीर्थक्षेत्र माहूरच्या विकासासाठी ७९ कोटी रुपयांचा निधी तर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिल्याने शहरास तीर्थक्षेत्राला साजेशे रूपय येत असून इतर समस्यांविषयी तालुक्यातील नेते पदाधिकारी पाठपुरावा करू शकत नसल्याने नेते, पदाधिकाऱ्यांविषयी जनतेतून प्रचंड नाराजी होत आहे़ (वार्ताहर)महत्त्वाचे म्हणजे येथे मृत्यूशय्येवर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय मंजूर होवूनही कुठलीच हालचाल झाली नाही़ महिनाभरात १०० पेक्षा जास्त अपघातांची नोंद होवूनही व गेल्या १० वर्षांपासून येथे ट्रॉमा केअर सेंटरची मागणी असताना अद्यापपर्यंत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याविषयी कुणीही आवाज उठविलेला नाही़ त्यामुळे शेकडो अपघातग्रस्त नागरिकांना जीव गमवावा लागलेला आहे़