शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

डीपीडीसीनेही दुर्लक्ष केल्याचा आरोप

By admin | Updated: July 3, 2014 00:23 IST

श्रीक्षेत्र माहूर: नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने तालुका आजपर्यंत विकासात्मक बाबीत मागासलेला राहिला़

श्रीक्षेत्र माहूर: नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने तालुका आजपर्यंत विकासात्मक बाबीत मागासलेला राहिला़ त्यात जिल्हा नियोजन समितीने शहरातील विकासात्मक कामांबाबत दखल न घेतल्याने तालुक्याच्या मागासलेपणात भर पडत आहे़शहरात वर्षभरात कोट्यवधी भाविक भक्त पर्यटकांची सतत वर्दळ असते़ तालुक्यात व शहरात एकमेव असलेल्या बसस्थानकात पाच एकर जागा असूनही दर्शनी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स, अद्ययावत बसस्थानक, प्रतीक्षालय इत्यादी सुविधा देण्याची अनेक वर्षापासूनच्या मागणीला आदिवासी उपाय योजनेतून ५० लाख रुपये सुशोभिकरणातून देवून बोळवण करण्यात आली आहे़ तसेच येथील म़रा़ वि़म़ कंपनी कार्यालयाकडेही ६ एकर जागा आहे़ या कार्यालयाच्या दर्शनी भागात रेणुका देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून मोठी जागा शिल्लक असल्याने येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स, कर्मचारी निवासस्ािने अद्ययावत कार्यालय तसेच प्रवासी निवारा बांधून देण्याचीही मागणी फार जुनी असूनही याकडे जिल्हा नियोजन समितीने सतत दुर्लक्ष केले़ तालुक्यात आदिवासी व बंजारा समाजाचे प्रमाण जास्त असूनही आदिवासींच्या मुलामुलींच्या शिक्षण रोजगारासाठी एकही शाळा, वसतिगृह किंवा उद्योग प्रशिक्षण यासाठी आजपर्यंत एकही इमारत सुद्धा बांधण्यात आली नाही़ तसेच बंजारा समाजाच्या मुला-मुलींसाठी एकही वसतिगृह किंवा उद्योगासाठी प्रशिक्षणकेंद्र सुरू करण्यात आलेले नाही़माजी मुख्यमंत्री तथा खा़ अशोकराव चव्हाण हे जिल्ह्याचे खरे भूमिपूत्र व येथील देवस्थानाबद्दल आस्था तर परिसरातील जनतेच्या समस्या समजून घेणारे दूरदृष्टी असणारे लोकनेते असल्याने त्यांनी तीर्थक्षेत्र माहूरच्या विकासासाठी ७९ कोटी रुपयांचा निधी तर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिल्याने शहरास तीर्थक्षेत्राला साजेशे रूपय येत असून इतर समस्यांविषयी तालुक्यातील नेते पदाधिकारी पाठपुरावा करू शकत नसल्याने नेते, पदाधिकाऱ्यांविषयी जनतेतून प्रचंड नाराजी होत आहे़ (वार्ताहर)महत्त्वाचे म्हणजे येथे मृत्यूशय्येवर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय मंजूर होवूनही कुठलीच हालचाल झाली नाही़ महिनाभरात १०० पेक्षा जास्त अपघातांची नोंद होवूनही व गेल्या १० वर्षांपासून येथे ट्रॉमा केअर सेंटरची मागणी असताना अद्यापपर्यंत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याविषयी कुणीही आवाज उठविलेला नाही़ त्यामुळे शेकडो अपघातग्रस्त नागरिकांना जीव गमवावा लागलेला आहे़