शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

सर्वच दलित नेत्यांनी ऐक्याची दिली साद

By admin | Updated: January 15, 2016 23:55 IST

औरंगाबाद : विद्यापीठगेट परिसरात गुरुवारी सायंकाळी विविध ८ व्यासपीठांवर बुद्ध-भीमगीतांचा गजर सुरू होता. रात्री ७.३० - ८.०० वाजेच्या सुमारास व्यासपीठांवर त्या-त्या पक्ष-संघटनांच्या नेत्यांचे आगमन झाले

औरंगाबाद : विद्यापीठगेट परिसरात गुरुवारी सायंकाळी विविध ८ व्यासपीठांवर बुद्ध-भीमगीतांचा गजर सुरू होता. रात्री ७.३० - ८.०० वाजेच्या सुमारास व्यासपीठांवर त्या-त्या पक्ष-संघटनांच्या नेत्यांचे आगमन झाले तेव्हा सभामंडपासमोरचा नूर एकदम पालटला. गाण्यांचे बोल थांबले अन् नेत्यांनी माईकचा ताबा घेतला. प्रत्येकाचा एकच घोष, आम्ही विद्यापीठ नामांतरासाठी अमुक केले, तमुक केले... एवढेच नव्हे, तर ते लाचार झाले... त्यांनी चळवळ दावणीला बांधली... अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या... असे असले तरी मात्र सर्वच नेत्यांनी ‘निळ्या झेंड्याखाली जनतेने एकत्र यावे’, असा सूर आळवला हेही नसे थोडके!डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या २२ व्या वर्धापन दिन सोहळ्याला कधी नव्हे ती यंदा अलोट गर्दी उसळली होती. रात्री ११ वाजेपर्यंत गर्दीने आजवरचा उच्चांक मोडला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक आंबेडकर अनुयायी विद्यापीठगेटसमोर तथागत गौतम बुद्ध, शहीद स्मारक आणि बाजूला बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर दिसत होती. बाबासाहेबांच्या पुतळ्यालगतच पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्या व्यासपीठावर गंगाधर गाडे यांनी सभेला संबोधित केले. या व्यासपीठाच्या मागे आंबेडकर महाविद्यालय कर्मचारी निवासस्थान मैदानावर युथ रिपब्लिकन पार्टीचे नेते मनोज संसारे यांची सभा झाली. ‘अजिंठा’ या मिलिंद विज्ञान महाविद्यालय मुलांचे वसतिगृह परिसरात भारतीय जनता पक्षाचे भव्य व्यासपीठ होते. त्या व्यासपीठावर गायक अभिजित कोसंबी आणि प्रसेनजित कोसंबी यांनी भीमगीते सादर केली. ८ वाजेच्या सुमारास व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे, शिरीश बोराळकर, नगरसेवक राजू शिंदे, प्रमोद राठोड, डॉ. भागवत कराड आदींचे आगमन झाले. विद्यापीठगेटच्या मागे कुतुबपुरा परिसरात रिपब्लिकन सेनेचे व्यासपीठ होते. तेथे पक्षाध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी- बहुजन जनतेने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना मानवंदना म्हणून या परिसरात स्मारक उभारण्याचा मानस बोलून दाखविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरात रिपब्लिकन पक्षाचे भव्य व्यासपीठ होते. या व्यासपीठावर प्रख्यात गायक प्रतापसिंग बोदडे, शाहीर सावदेकर, कुणाल वराळे, अमरावती येथील गायक वानखेडे यांनी एकापेक्षा एक प्रबोधनात्मक भीमगीते सादर केली. या व्यासपीठावर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांचे आगमन झाले. व्यासपीठावर शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, रिपब्लिकन नेते गौतम भालेराव, दौलत खरात, माजी आ. अनिल गोंडाने, पप्पू कागदे, कांतीकुमार जैन, संजय ठोकळ, किशोर थोरात, श्रावण गायकवाड, विजय मगरे, सुंदर साळवे, प्रकाश कांबळे, प्रा. सुनील मगरे, नागराज गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम होते, तर सूत्रसंचालन मिलिंद शेळके यांनी केले. यावेळी रिपाइं कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरील उपस्थित सर्वच नेत्यांचे एका भव्य पुष्पहाराने स्वागत केले.