शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

खाजगी टँकरच्या पाण्यात क्षारच क्षार !

By admin | Updated: April 22, 2016 00:33 IST

सितम सोनवणे , लातूर लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक शहरातील तसेच शहराबाहेरील बोअर व खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत.

सितम सोनवणे , लातूरलातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक शहरातील तसेच शहराबाहेरील बोअर व खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत. या पाण्यात क्षारचे प्रमाण ५०० पीपीएम पेक्षा जास्त असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये आढळून आले आहे. ३८ पैकी १२ नमुन्यांमध्ये क्षारचे प्रमाण ५०० पेक्षा अधिक आहे. तर ३८ पैकी २० इतक्या नमुन्यांमध्ये २०० पीपीएम पेक्षा अधिक क्षारचे प्रमाण आहे. सातत्याने असे क्षारयुक्त पाणी पिणे आरोग्यास अपायकारक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. पाण्यामध्ये मानकानुसार क्षार असावेत. ५०० पेक्षा कमी क्षार पाण्यामध्ये असणे आवश्यक असते, असेही आरोग्य संघटनेचे शिवाय, लातूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील विविध जलस्त्रोत तसेच परजिल्ह्यातील व शहरातील विंधन विहिरी, विहिरींच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परजिल्ह्यातून आलेले पाणी शहरातील सर्व लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड असून, नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी खाजगी टँकर अथवा मोफत पाणी वाटप टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. हे टँकरचालक शहरातील व शहराबाहेरील विंधन विहिरी, विहिरी व इतर जलस्त्रोतांतून पाणी संकलित करून नागरिकांना पुरवठा करीत आहे. या पाण्यात क्षारचे प्रमाण किती प्रमाणात आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत चमू’ने बुधवारी व गुरुवारी सलग दोन दिवस शहरातील विवेकानंद चौक परिसर, इंदिरा नगर, नाथ नगर, आनंद नगर, हरिभाऊ नगर, साळे गल्ली, गवळी गल्ली, सावेवाडी, खाडगाव रोड, कपिल नगर, सद्गुरु नगर, औसा रोड परिसरातील विंधन विहिरी व टँकरद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची टीडीएस मीटरच्या सहाय्याने (क्षार तपासणी मीटर) तपासणी केली असता जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार १०० ते ३०० पीपीएम हे पाणी नागरिकांना पिण्यास योग्य असते. तसेच ३०० ते ५०० पीपीएमचे पाणी पिण्यास उपयुक्त ठरते. तर ५०० पीपीएमच्या पुढील पाणी हे आरोग्यास अपायकारक ठरत असते, अशी माहिती रसायनशास्त्र विश्लेषक संजय नखाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.क्षारयुक्त पाणी म्हणजे हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम, सोडियम, सल्फेट, लेड, फ्लोराईड, निकेल आदी घटक असतात. पाण्यातील जास्त कॅल्शियममुळे मूतखडा, जास्त सोडियममुळे उच्च रक्तदाब, जास्त सल्फेटमुळे अपचन, लेडमुळे लहान मुलांमध्ये शारीरिक विकास खुंटणे आणि फ्लोराईडमुळे हाडांचे विकार होतात. तर निकेलमुळे किडनीचे विकार उद्भवतात. पाण्यातील हे सर्व घटक संतुलित करणे आवश्यक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार ५०० पीपीएमच्या पुढचे पाणी पिणे म्हणजे वरील आजार ओढवून घेणे होय, असे शहरातील प्रसिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. हंसराज बाहेती म्हणाले. वॉटरमधील हार्डनेसपणा कमी केलाच पाहिजे. पाण्यात जास्त क्षार असेल तर किडनीत गाळ तयार होतो. त्याचे खड्यात रुपांतर होऊन मूतखडा होतो. गाळामुळे किडनी मार्गावर जखमाही होतात. इन्फेक्शनही होते. विशेष करून बोअरच्या पाण्यामध्ये असे घटक जास्त असतात. त्यामुळे पाण्यातील प्रस्तुत घटक प्रमाणानुसार करणे आवश्यक असल्याचे डॉ. हंसराज बाहेती यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने टँकरनेच पाणीपुरवठा होतो. परंतु, मनपाकडून जलशुद्धीकरण करून पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे या पाण्यातील टीडीएसचे प्रमाण घटविण्यात आले आहे. हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटर करण्यात आले असून, या पाण्यातील क्षारचे प्रमाण २०० पीपीएमपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे मिनरल वॉटरमध्ये क्षार ३५ ते ४० पीपीएम असतात. या तोडीचे पाणी मनपाकडून वाटप केले जात आहे. मनपामार्फत पाणी वाटप होणारे नऊ नमुने तपासले असता क्षारचे प्रमाण १५५ ते १६५ पीपीएम होते. काही नमुन्यांत तर यापेक्षा कमी प्रमाण निघाले. विवेकानंद चौक, सरस्वती कॉलनी येथील जलकुंभातील पाण्याची तपासणी केली असता यातील क्षारही प्रमाणित होते.