शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

खाजगी टँकरच्या पाण्यात क्षारच क्षार !

By admin | Updated: April 22, 2016 00:33 IST

सितम सोनवणे , लातूर लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक शहरातील तसेच शहराबाहेरील बोअर व खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत.

सितम सोनवणे , लातूरलातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक शहरातील तसेच शहराबाहेरील बोअर व खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत. या पाण्यात क्षारचे प्रमाण ५०० पीपीएम पेक्षा जास्त असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये आढळून आले आहे. ३८ पैकी १२ नमुन्यांमध्ये क्षारचे प्रमाण ५०० पेक्षा अधिक आहे. तर ३८ पैकी २० इतक्या नमुन्यांमध्ये २०० पीपीएम पेक्षा अधिक क्षारचे प्रमाण आहे. सातत्याने असे क्षारयुक्त पाणी पिणे आरोग्यास अपायकारक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. पाण्यामध्ये मानकानुसार क्षार असावेत. ५०० पेक्षा कमी क्षार पाण्यामध्ये असणे आवश्यक असते, असेही आरोग्य संघटनेचे शिवाय, लातूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील विविध जलस्त्रोत तसेच परजिल्ह्यातील व शहरातील विंधन विहिरी, विहिरींच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परजिल्ह्यातून आलेले पाणी शहरातील सर्व लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड असून, नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी खाजगी टँकर अथवा मोफत पाणी वाटप टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. हे टँकरचालक शहरातील व शहराबाहेरील विंधन विहिरी, विहिरी व इतर जलस्त्रोतांतून पाणी संकलित करून नागरिकांना पुरवठा करीत आहे. या पाण्यात क्षारचे प्रमाण किती प्रमाणात आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत चमू’ने बुधवारी व गुरुवारी सलग दोन दिवस शहरातील विवेकानंद चौक परिसर, इंदिरा नगर, नाथ नगर, आनंद नगर, हरिभाऊ नगर, साळे गल्ली, गवळी गल्ली, सावेवाडी, खाडगाव रोड, कपिल नगर, सद्गुरु नगर, औसा रोड परिसरातील विंधन विहिरी व टँकरद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची टीडीएस मीटरच्या सहाय्याने (क्षार तपासणी मीटर) तपासणी केली असता जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार १०० ते ३०० पीपीएम हे पाणी नागरिकांना पिण्यास योग्य असते. तसेच ३०० ते ५०० पीपीएमचे पाणी पिण्यास उपयुक्त ठरते. तर ५०० पीपीएमच्या पुढील पाणी हे आरोग्यास अपायकारक ठरत असते, अशी माहिती रसायनशास्त्र विश्लेषक संजय नखाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.क्षारयुक्त पाणी म्हणजे हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम, सोडियम, सल्फेट, लेड, फ्लोराईड, निकेल आदी घटक असतात. पाण्यातील जास्त कॅल्शियममुळे मूतखडा, जास्त सोडियममुळे उच्च रक्तदाब, जास्त सल्फेटमुळे अपचन, लेडमुळे लहान मुलांमध्ये शारीरिक विकास खुंटणे आणि फ्लोराईडमुळे हाडांचे विकार होतात. तर निकेलमुळे किडनीचे विकार उद्भवतात. पाण्यातील हे सर्व घटक संतुलित करणे आवश्यक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार ५०० पीपीएमच्या पुढचे पाणी पिणे म्हणजे वरील आजार ओढवून घेणे होय, असे शहरातील प्रसिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. हंसराज बाहेती म्हणाले. वॉटरमधील हार्डनेसपणा कमी केलाच पाहिजे. पाण्यात जास्त क्षार असेल तर किडनीत गाळ तयार होतो. त्याचे खड्यात रुपांतर होऊन मूतखडा होतो. गाळामुळे किडनी मार्गावर जखमाही होतात. इन्फेक्शनही होते. विशेष करून बोअरच्या पाण्यामध्ये असे घटक जास्त असतात. त्यामुळे पाण्यातील प्रस्तुत घटक प्रमाणानुसार करणे आवश्यक असल्याचे डॉ. हंसराज बाहेती यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने टँकरनेच पाणीपुरवठा होतो. परंतु, मनपाकडून जलशुद्धीकरण करून पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे या पाण्यातील टीडीएसचे प्रमाण घटविण्यात आले आहे. हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटर करण्यात आले असून, या पाण्यातील क्षारचे प्रमाण २०० पीपीएमपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे मिनरल वॉटरमध्ये क्षार ३५ ते ४० पीपीएम असतात. या तोडीचे पाणी मनपाकडून वाटप केले जात आहे. मनपामार्फत पाणी वाटप होणारे नऊ नमुने तपासले असता क्षारचे प्रमाण १५५ ते १६५ पीपीएम होते. काही नमुन्यांत तर यापेक्षा कमी प्रमाण निघाले. विवेकानंद चौक, सरस्वती कॉलनी येथील जलकुंभातील पाण्याची तपासणी केली असता यातील क्षारही प्रमाणित होते.