शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आलियाबाद झाले ‘स्मार्ट ग्राम’

By admin | Updated: January 2, 2017 23:53 IST

तुळजापूर : राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेअंतर्गत तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद गावाची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

तुळजापूर : राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेअंतर्गत तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद गावाची ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी शासनाच्या वतीने पुरस्कार व प्रमाणपत्र देवून या ग्रामपंचायतीचा सन्मान केला जाणार आहे. गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता तसेच पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून व संपन्न गावची निर्मिती करण्याचा दृष्टीने राज्यात सन २०१०-२०११ पासून पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सुरु करण्यात आली. या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये तालुक्यतील १०८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. यातून स्वमुल्यांकनात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या २५ टक्के म्हणजेच २७ ग्रामपंचायतीची स्पर्धेसाठी निवड झाली. यातून अलियाबाद ही ग्रामपंचायत प्रथम आली आहे. अलियाबाद गावाची लोकसंख्या ११२० असून, गावातील ९० टक्के कुटुंबांनी स्वच्छतागृह उभारले आहे. तसेच गावात लोकसंख्येचा तीनपट विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीने पर्यावरण विकास तसेच निर्मल ग्राम पुरस्कारही मिळविला आहे. संत गाडगेबाबा अभियानातही ही ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम आली आहे. २६ जानेवारी रोजी १० लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. (वार्ताहर)