शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

अक्षय्य तृतीयेला होणार ८० टन आमरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:04 IST

अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे मोठे नुकसान झाले. तरी यंदा अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीला येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या ...

अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे मोठे नुकसान झाले. तरी यंदा अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीला येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंबा दान करून मग आमरस खाण्यास सुरुवात केली जाते. अक्षय्य तृतीया ते वटपौर्णिमापर्यंत आंबे खाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र, आंब्याच्या पहिल्या पेटीच्या आगमनापासून त्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्याही आता वाढली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आवर्जून प्रत्येक घरात आमरसाचा बेत होतोच. यामुळे जाधववाडी येथील आडत बाजारात ८० टन आंबा विक्रीला आला आहे. त्यातील बहुतांश आंबा विक्री झाल्याचे आडत व्यापाऱ्यांनी नमूद केले. बाजारात ७० ते २०० रुपये किलोपर्यंत आंबा विकला जात आहे. आज आंबा खरेदीसाठी बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती. आता मराठवाड्यातील केशर आंबाही विक्रीला आला आहे. त्यास १५० ते २०० रुपये किलोपर्यंत भाव मिळत असल्याचे केशर आंबा उत्पादकांनी सांगितले.