शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

स्थानिक नेत्यांना अजित पवारांची तंबी

By admin | Updated: August 6, 2014 02:23 IST

मोहन बोराडे , सेलू लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्यांची पक्षाला गरज नाही. त्यामुळे आताच त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करावी,

मोहन बोराडे , सेलूलोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्यांची पक्षाला गरज नाही. त्यामुळे आताच त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करावी, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात दिल्याने लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम केलेले स्थानिक नेते चांगलेच घायाळ झाल्याचे पहावयास मिळाले.सेलूत येथील श्रीराम प्रतिष्ठाणच्या विद्याविहार संकुलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा निर्धार मेळाव्याचे आयोजन ५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते़ यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री सुरेश धस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विक्रम काळे, अ‍ॅड़ गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ रामराव वडकुते, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जू लाला, डॉ़ मधुसूदन केंद्रे, डॉ़ संजय रोडगे, राजेश विटेकर, सुरेश जाधव, बाळासाहेब जामकर , सारंगधर महाराज, अशोक काकडे, विनायक पावडे, राजेंद्र लहाने, प्रसाद बुधवंत, अजय चौधरी, माऊली ताठे, प्रताप सोळंके, अ‍ॅड़ रामेश्वर शेवाळे, सुरेश भुमरे आदींची उपस्थिती होती़उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काहींनी काम केले. विरोधात स्पर्धक उमेदवाराला मतदान करण्याचे फोन केले गेले. अशांनी आताच त्यांच्या कामात सुधारणा करावी, असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला. यामुळे पक्षविरोधी काम केलेल्या पक्षातील काही नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले. पवार म्हणाले, केंद्राच्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली. त्याबाबत महाराष्ट्रातील खासदार गप्प राहतात़ मात्र खराब चपाती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्यांच्या तोंडात ती कोंबतात. मोदी लाटेत निवडून आलेल्या महायुतीच्या खासदारांना कुठलाही अनुभव नाही़ रेल्वे प्रश्नासाठी या खासदारांनी काय केले, असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित करून केंद्र सरकारवर टीका केली. ‘अच्छे दिन आने वाले है’ हे म्हणणारे आज कुठेही दिसत नाहीत. सत्तेत आल्यानंतर भाजपाने सर्वत्र महागाई करून लोकांची दिशाभूल केली. भाजपाला निवडणुकीत बहुजन चेहरा लागतो. मात्र सत्ता येताच दुसरेच चेहरे समोर येतात़ मूठभर लोकांचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवील़ पंतप्रधान नेपाळला आर्थिक मदत देतात मात्र येथील शेतकऱ्यांना मदत देत नाहीत, असा आरोप करून अजित पवार यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. प्रास्ताविक प्रदेश चिटणीस डॉ़ संजय रोडगे यांनी केले.