शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी

By admin | Updated: October 12, 2014 00:39 IST

संतोष धारासूरकर, जालना आदर्श आचारसंहितेचा जिल्हा प्रशासनाद्वारे डांगोरा पिटविला जात असतांना पाचही मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता खुंटीला

संतोष धारासूरकर, जालनाआदर्श आचारसंहितेचा जिल्हा प्रशासनाद्वारे डांगोरा पिटविला जात असतांना पाचही मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता खुंटीला टांगल्याचे केविलवाणे चित्र समोर आले आहे.जिल्ह्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या मातब्बरांकरीता या निवडणुका अक्षरश: प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. त्यामुळेच सर्व शक्तीनिशी हे मातब्बर निवडणूक लढवित आहेत. स्वत:सह त्यांचे कुटुंबिय, नातेगोते, आप्त व मित्रपरिवार सकाळपासून रात्रीपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. विशेष म्हणजे या लढतीत कोणतीही कमतरता ठेवायचीच नाही, असा संकल्प सुध्दा या मातब्बरांनी सोडला आहे. त्यामुळेच या लढतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रतिस्पर्ध्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पैशांच्या थैल्या ओतल्या जात आहेत. टाचणी आणण्यापासून ते भाडोत्री कार्यकर्त्यांवर दररोज लाखो रुपये उधळले जात आहेत. ग्रामीण भागात एका-एका गावास वातावरण निर्मितीसाठी किमान लाख रुपये, बैठका किंवा कॉर्नर सभांसाठी ५० हजार रुपये, पदयात्रांसाठी लाख रुपये तसेच छोट्या-मोठ्या नेत्यांच्या सभांना भाडोत्री कार्यकर्ते वाहनांद्वारे आणण्यासाठी अमाप पैसा खर्च होतो आहे. या जिल्ह्यात राज्य पातळीवरील पुढाऱ्यांच्या सभांना किमान १० लाख तर राष्ट्रीय पातळींवरील पुढाऱ्यांच्या सभांना किमान २० लाख रुपये खर्च होतो आहे. भाडोत्री कार्यकर्त्यांना दिवसामागे प्रत्येकी ३०० रुपये तर महिलांना २०० रुपये रोज हातावर टिकविला जातो आहे. या व्यतिरिक्त वाहनांना इंधनाव्यतिरिक्त अव्वाकी सव्वा दराने भाडे दिले जाते आहे. एका-एका वाहनांमागे ५ ते १० हजार रुपये खर्च होतो आहे.काही मतदारसंघातील मातब्बरांनी आपापल्या शेतातील आखाड्यांवर किंवा निवासस्थानांसह प्रचार कार्यालयाजवळ भट्ट्या पेटविल्या आहेत. त्याठिकाणी सकाळपासून ते रात्रीपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांच्या पंक्ती उठत आहेत. चहा-पाणी, नाष्टा, जेवणावळ्यांवर सर्रास मोठा खर्च सुरु असून त्याव्यतिरिक्त धाब्यांवरील व्हेज-नॉनव्हेज जेवणांसह मद्यपानांकरीताही हजारो रुपये मोजले जात आहेत.गावा-गावांमधून प्रचार रथ दौडत आहेत. त्यावर पूर्णवेळ कार्यकर्ते तैनात करण्यात आले आहेत. रथासह त्या कार्यकर्त्यांचा खर्चही मोठा आहे. गावा-गावातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची मनधरणी करतांना काही पदाधिकारी व चाणाक्ष कार्यकर्त्यांना केवळ प्रचार ंयुध्दास जुंपण्याकरीता खिशात मातब्बरांना नव्याकोऱ्या नोटा त्यांच्या खिशात कोंबाव्या लागत आहेत. काहींनी टोकन पध्दत अवलंबिली आहे. त्याशिवाय हे चाणाक्ष कार्यकर्ते ‘चार्ज’च होत नाहीत, हे प्रकर्षाने दिसून आले आहे. एकेक दिवस महत्वाचा आहे. त्यामुळेच तो दिवस आपलाच असावा, असा मातब्बरांनी चंग बांधला आहे. एकेक दिवस महागडा ठरतो आहे. त्यामुळे एक-एक दिवस ढकलला जावा यासाठी हे मातब्बर प्रयत्न करीत आहेत. परंतू खर्चाविना चर्चाच होत नाही, असा सर्वसाधारण चित्र असल्यामुळेच नाईलाजाने का असेना उमेदवारांना पैसा बाहेर काढावा लागतो आहे. येत्या चार दिवसात तर उमेदवारांचा दररोजचा खर्च लाखोंच्या घरात असेल, हे स्पष्ट आहे. कारण बुथनिहाय यंत्रणा, मतदारराजास नेण्या-आणण्याकरीता वाहने, स्थलांतर केलेल्या मतदारांना गावी आणण्यासाठी गाड्याघोड्यांसह अन्य खर्च लाखोंच्या घरात आहे.