शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने औरंगाबाद विमानतळावरील विमानसेवेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 12:34 IST

शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे.

औरंगाबाद, दि. २५ : शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे. 

 शिर्डी येथील विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने २१ सप्टेंबरला सार्वजनिक वापराचे विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला. त्यामुळे साई भक्तांची सोय होणार आहे; परंतु अवघ्या ११० कि.मी. अंतरावरील या विमानतळामुळे औरंगाबादच्या विमानतळावर आगामी काळात परिणाम होऊ शकतो.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या  सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. 

ट्रूजेटच्या विमानाने तिरुपतीला जाणा-या आणि दक्षिणेतून शिर्डी दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे.  प्रत्येक दिवशीचे विमान प्रवाशांनी भरून जाते. या विमानाने औरंगाबादला आल्यानंतर प्रवाशांना ट्रॅव्हल्सने शिर्डीला ये-जा करावी लागते. त्यासाठी मोठा खर्च होतो. हा खर्च वाचविण्यासाठी ही विमानसेवा औरंगाबादऐवजी हैदराबाद-शिर्डी अशी थेट होऊ शकते. 

दिल्लीवरून येणा-या एअर इंडियाच्या विमानातून ३० ते ४० टक्के प्रवासी शिर्डीला जाण्यासाठी येतात. दिल्ली-शिर्डी विमानसेवेमुळे प्रवासी औरंगाबादला वळसा घालणे टाळू शकतात. शिर्डीसाठी येणारे प्रवासी औरंगाबादेत हॉटेलमध्ये अनेकदा मुक्काम करतात. येथून खाजगी वाहनांनी शिर्डीला जातात. नव्या विमानतळाचा या व्यवसायावर फरक पडेल.ट्रूजेटच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

पाठपुरावा करूशिर्डी विमानतळामुळे औरंगाबादवर परिणाम होईल, असे वाटत नाही. या विमानतळामुळे औरंगाबादचे एखादे विमान बंद होणार असेल तर ‘सीएमआयए’ तसे होऊ देणार नाही. औरंगाबादेत आल्यावर भाविक  थेट शिर्डीला जातात. त्यामुळे शहरातील हॉटेल्सवर फारसा फरक पडणार नाही.-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)

निश्चित परिणामशिर्डी विमानतळ विकसित होणार आहे. औरंगाबादला येऊन शिर्डीला वाहनांनी जाण्याऐवजी प्रवासी थेट विमानाने जातील. त्यामुळे आगामी कालावधीत त्याचा औरंगाबादवर निश्चित परिणाम होईल. -अब्दुल अजीज, व्यावसायिक, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स