शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने औरंगाबाद विमानतळावरील विमानसेवेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 12:34 IST

शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे.

औरंगाबाद, दि. २५ : शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे. 

 शिर्डी येथील विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने २१ सप्टेंबरला सार्वजनिक वापराचे विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला. त्यामुळे साई भक्तांची सोय होणार आहे; परंतु अवघ्या ११० कि.मी. अंतरावरील या विमानतळामुळे औरंगाबादच्या विमानतळावर आगामी काळात परिणाम होऊ शकतो.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या  सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. 

ट्रूजेटच्या विमानाने तिरुपतीला जाणा-या आणि दक्षिणेतून शिर्डी दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे.  प्रत्येक दिवशीचे विमान प्रवाशांनी भरून जाते. या विमानाने औरंगाबादला आल्यानंतर प्रवाशांना ट्रॅव्हल्सने शिर्डीला ये-जा करावी लागते. त्यासाठी मोठा खर्च होतो. हा खर्च वाचविण्यासाठी ही विमानसेवा औरंगाबादऐवजी हैदराबाद-शिर्डी अशी थेट होऊ शकते. 

दिल्लीवरून येणा-या एअर इंडियाच्या विमानातून ३० ते ४० टक्के प्रवासी शिर्डीला जाण्यासाठी येतात. दिल्ली-शिर्डी विमानसेवेमुळे प्रवासी औरंगाबादला वळसा घालणे टाळू शकतात. शिर्डीसाठी येणारे प्रवासी औरंगाबादेत हॉटेलमध्ये अनेकदा मुक्काम करतात. येथून खाजगी वाहनांनी शिर्डीला जातात. नव्या विमानतळाचा या व्यवसायावर फरक पडेल.ट्रूजेटच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

पाठपुरावा करूशिर्डी विमानतळामुळे औरंगाबादवर परिणाम होईल, असे वाटत नाही. या विमानतळामुळे औरंगाबादचे एखादे विमान बंद होणार असेल तर ‘सीएमआयए’ तसे होऊ देणार नाही. औरंगाबादेत आल्यावर भाविक  थेट शिर्डीला जातात. त्यामुळे शहरातील हॉटेल्सवर फारसा फरक पडणार नाही.-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)

निश्चित परिणामशिर्डी विमानतळ विकसित होणार आहे. औरंगाबादला येऊन शिर्डीला वाहनांनी जाण्याऐवजी प्रवासी थेट विमानाने जातील. त्यामुळे आगामी कालावधीत त्याचा औरंगाबादवर निश्चित परिणाम होईल. -अब्दुल अजीज, व्यावसायिक, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स