शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने औरंगाबाद विमानतळावरील विमानसेवेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 12:34 IST

शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे.

औरंगाबाद, दि. २५ : शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे. 

 शिर्डी येथील विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने २१ सप्टेंबरला सार्वजनिक वापराचे विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला. त्यामुळे साई भक्तांची सोय होणार आहे; परंतु अवघ्या ११० कि.मी. अंतरावरील या विमानतळामुळे औरंगाबादच्या विमानतळावर आगामी काळात परिणाम होऊ शकतो.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या  सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले. 

ट्रूजेटच्या विमानाने तिरुपतीला जाणा-या आणि दक्षिणेतून शिर्डी दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे.  प्रत्येक दिवशीचे विमान प्रवाशांनी भरून जाते. या विमानाने औरंगाबादला आल्यानंतर प्रवाशांना ट्रॅव्हल्सने शिर्डीला ये-जा करावी लागते. त्यासाठी मोठा खर्च होतो. हा खर्च वाचविण्यासाठी ही विमानसेवा औरंगाबादऐवजी हैदराबाद-शिर्डी अशी थेट होऊ शकते. 

दिल्लीवरून येणा-या एअर इंडियाच्या विमानातून ३० ते ४० टक्के प्रवासी शिर्डीला जाण्यासाठी येतात. दिल्ली-शिर्डी विमानसेवेमुळे प्रवासी औरंगाबादला वळसा घालणे टाळू शकतात. शिर्डीसाठी येणारे प्रवासी औरंगाबादेत हॉटेलमध्ये अनेकदा मुक्काम करतात. येथून खाजगी वाहनांनी शिर्डीला जातात. नव्या विमानतळाचा या व्यवसायावर फरक पडेल.ट्रूजेटच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

पाठपुरावा करूशिर्डी विमानतळामुळे औरंगाबादवर परिणाम होईल, असे वाटत नाही. या विमानतळामुळे औरंगाबादचे एखादे विमान बंद होणार असेल तर ‘सीएमआयए’ तसे होऊ देणार नाही. औरंगाबादेत आल्यावर भाविक  थेट शिर्डीला जातात. त्यामुळे शहरातील हॉटेल्सवर फारसा फरक पडणार नाही.-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)

निश्चित परिणामशिर्डी विमानतळ विकसित होणार आहे. औरंगाबादला येऊन शिर्डीला वाहनांनी जाण्याऐवजी प्रवासी थेट विमानाने जातील. त्यामुळे आगामी कालावधीत त्याचा औरंगाबादवर निश्चित परिणाम होईल. -अब्दुल अजीज, व्यावसायिक, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स