शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

‘डीसीसी’च्या उर्जितावस्थेसाठी हवा शासनाचा पुढाकार

By admin | Updated: May 12, 2017 23:48 IST

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा बँक विविध कारणांनी अडचणीत आली आहे़

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा बँक विविध कारणांनी अडचणीत आली आहे़ अडचणीत आलेल्या या बँकेला उर्जितावस्था देण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. आता खऱ्या अर्थाने या बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे़ इतर बँकांप्रमाणे या बँकेलाही आर्थिक मदतीचा हात देतानाच थकीत कर्ज वसुलीत समन्वयक म्हणून शासनाने भूमिका पार पाडल्यास शेतकऱ्यांची रक्तवाहीनी असलेल्या या बँकेला पुन्हा एकदा गतवैभव मिळू शकते.आरबीआयच्या सूचनेनुसार बँकेने अटींची पूर्तता केली आहे़ असे असले तरी आर्थिक अडचणीत असलेल्या बँकेतील चलन तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे़ मे २०१२ मध्ये आरबीआयने नवीन ठेवी स्विकारू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत़ तर दुसरीकडे कारखान्यांसह इतर कर्जे थकल्याने आर्थिक घडी कोलमडली आहे़ बँकेने अल्पव्याजाने किंवा बिनव्याजी २०० कोटी रूपये निधी मिळावा, असा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे़ हा निधी उपलब्ध झाला तर बँकेची आर्थिक घडी पूर्ववत होणार आहे़ याशिवाय बँकेने वसूल भागभांडवलाच्या २५ टक्के प्रमाणे राज्य शासनाकडे १५़४४ कोटींचा प्रस्ताव सहकार आयुक्तांच्या शिफारशीनुसार पाठविला आहे़ या प्रस्तावालाही मंजुुरी मिळणे गरजेचे आहे़तीन सहकारी साखर कारखान्यांना शासन थकहमी अंतर्गत कर्जाचे वाटप झाले आहे़ शासनाने ७०़७४ कोटी कर्ज वाटपास थकहमी दिली होती़ मार्च १७ अखेर एकूण १५८़९२ कोटी रक्कम येणे बाकी आहे़ ही कर्जवसुली झाल्यानंतर थकबाकीसह एऩपी़एक़मी होण्यास मदत होणार आहे़ याशिवाय जिल्हा परिषदेचे व्यवहार पूर्ववत जिल्हा बँकेतून करणे, शासकीय- निमशासकीय शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या पगारी पूर्ववत जिल्हा बँकेतून करणे, साखर कारखान्याकडील कर्जवसुलीसाठी विशेष बैठक बोलावून कर्जवसुलीसाठी प्रयत्न करण्याकामी समन्वयकाची भूमिका बजावण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे घेऊन शेतकरी, शेतमजुरांची बँक पुन्हा उभी करणे गरजेचे आहे़