शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

‘डीसीसी’च्या उर्जितावस्थेसाठी हवा शासनाचा पुढाकार

By admin | Updated: May 12, 2017 23:48 IST

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा बँक विविध कारणांनी अडचणीत आली आहे़

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा बँक विविध कारणांनी अडचणीत आली आहे़ अडचणीत आलेल्या या बँकेला उर्जितावस्था देण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. आता खऱ्या अर्थाने या बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे़ इतर बँकांप्रमाणे या बँकेलाही आर्थिक मदतीचा हात देतानाच थकीत कर्ज वसुलीत समन्वयक म्हणून शासनाने भूमिका पार पाडल्यास शेतकऱ्यांची रक्तवाहीनी असलेल्या या बँकेला पुन्हा एकदा गतवैभव मिळू शकते.आरबीआयच्या सूचनेनुसार बँकेने अटींची पूर्तता केली आहे़ असे असले तरी आर्थिक अडचणीत असलेल्या बँकेतील चलन तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे़ मे २०१२ मध्ये आरबीआयने नवीन ठेवी स्विकारू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत़ तर दुसरीकडे कारखान्यांसह इतर कर्जे थकल्याने आर्थिक घडी कोलमडली आहे़ बँकेने अल्पव्याजाने किंवा बिनव्याजी २०० कोटी रूपये निधी मिळावा, असा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे़ हा निधी उपलब्ध झाला तर बँकेची आर्थिक घडी पूर्ववत होणार आहे़ याशिवाय बँकेने वसूल भागभांडवलाच्या २५ टक्के प्रमाणे राज्य शासनाकडे १५़४४ कोटींचा प्रस्ताव सहकार आयुक्तांच्या शिफारशीनुसार पाठविला आहे़ या प्रस्तावालाही मंजुुरी मिळणे गरजेचे आहे़तीन सहकारी साखर कारखान्यांना शासन थकहमी अंतर्गत कर्जाचे वाटप झाले आहे़ शासनाने ७०़७४ कोटी कर्ज वाटपास थकहमी दिली होती़ मार्च १७ अखेर एकूण १५८़९२ कोटी रक्कम येणे बाकी आहे़ ही कर्जवसुली झाल्यानंतर थकबाकीसह एऩपी़एक़मी होण्यास मदत होणार आहे़ याशिवाय जिल्हा परिषदेचे व्यवहार पूर्ववत जिल्हा बँकेतून करणे, शासकीय- निमशासकीय शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या पगारी पूर्ववत जिल्हा बँकेतून करणे, साखर कारखान्याकडील कर्जवसुलीसाठी विशेष बैठक बोलावून कर्जवसुलीसाठी प्रयत्न करण्याकामी समन्वयकाची भूमिका बजावण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे घेऊन शेतकरी, शेतमजुरांची बँक पुन्हा उभी करणे गरजेचे आहे़