शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर, परंतु आझाद मैदान सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील ठाम
3
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
4
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
5
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
6
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
7
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
8
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
9
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
10
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
11
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
12
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
13
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
14
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
15
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
16
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
17
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
18
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
19
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
20
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'

‘उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी’ उपक्रमात कृषी सहायकांना उद्दिष्ट

By admin | Updated: May 20, 2017 00:42 IST

लातूर : बियाणांच्या अनुवांशिक उत्पादनाची क्षमता अधिक असताना पारंपरिक पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे कृषी विभागाने यंदा ‘उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी’ हा उपक्रम हाती घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : बियाणांच्या अनुवांशिक उत्पादनाची क्षमता अधिक असताना पारंपरिक पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे कृषी विभागाने यंदा ‘उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी’ हा उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमात शेतकऱ्यांचा गट करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. उत्पादन वाढविण्यासाठी हा उपक्रम असून, रोहिणी नक्षत्रापासून मृग नक्षत्राच्या प्रारंभापर्यंत या अभियानात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्या बियाणांची निवड करावी, कोणते बियाणे अधिक उत्पादन देऊ शकते, खत आणि फवारणी औषधांचा कसा वापर करावा, मशागतीनंतर पेरणी कशी करावी, या सर्व बाबींचे प्रशिक्षण या अभियानात दिले जाणार आहे. प्रत्येक गावात २५ शेतकऱ्यांचा गट तयार करून कृषी विभागाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. पिकांच्या उत्पादन वाढीचे तंत्र या प्रशिक्षणात शिकविले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषितज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार असून, नव्या पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे. पारंपरिक शेतीमध्ये खर्चही निघत नाही. उत्पादन क्षमता चांगली असतानाही तो खर्च निघत नाही. जेवढे पीककर्ज आहे, त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे म्हणून हा उपक्रम कृषी विभागाने राबवायला सुरुवात केली आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रयोगानंतर अनुदानही दिले जाणार आहे.