शिरीष शिंदे , बीडयंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना पीककर्ज वाटपाचे २ हजार ५९ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. विशेष म्हणजे पीककर्जासह वाहन, हाऊसिंग, शिक्षण, कृषी संबधी व इतर अशा सर्व क्षेत्रांसाठी ३ हजार ६९६ कोटी ७८ लाख रुपये कर्ज वाटप करावे लागणार आहे.२०१५-१६ मध्ये बँकांना पीककर्जासाठी एक हजार ८०६ कोटी ९ लाख रूपयांचे टार्गेट देण्यात आले होते. त्यात यंदा ११ ते १२ टक्के वाढ होऊन ते दोन हजार ५९ कोटींवर जाऊन पोहचले आहे. त्यामध्ये औद्योगिक व व्यवसायासाठी ७९८ कोटी ७५ लाख, गृहनिर्माणसाठी १७५ कोटी, शिक्षणासाठी ११५ कोटी, इतर बाबींसाठी ५६ कोटी ८८ लाख तर कृषिसंबंधी असलेल्या म्हणजेच पॉवर, ट्रिलर, ट्रॅक्टर, गायी-म्हशी यासाठी ४८२ कोटी २४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जिल्ह्यातील २२ राष्ट्रीयीकृत बँका व त्यांच्या शाखा तसेच तीन व्यावसायिक बँका यांच्यासह इतर बँकांना हे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार शाखानिहाय कर्जवाटप यावर्षी होईल.शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज ?जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ कायम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी घेतलेले पीककर्ज फेडता आलेले नाही. आता चांगला पाऊस असला तरी त्यांना नव्याने पीककर्ज मिळेल का ? याबाबत कोणत्याही सूचना बँकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पीककर्ज घेऊन परत करणाऱ्यांनाच कर्ज मिळेल, अशी शक्यता आहे.
पीककर्ज वाटपाचे २ हजार ६० कोटींचे उद्दिष्ट
By admin | Updated: April 14, 2016 01:12 IST