शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचे ‘वरातीमागून घोडे’...!

By admin | Updated: July 12, 2016 00:59 IST

राजेश खराडे, बीड खरीप हंगामातील पेरण्यांनी सरासरीचा टप्पा पार केला आहे. १५ जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण होणार असल्याचा निर्वाळा कृषी विभागाकडून देण्यात आला असताना

राजेश खराडे, बीडखरीप हंगामातील पेरण्यांनी सरासरीचा टप्पा पार केला आहे. १५ जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण होणार असल्याचा निर्वाळा कृषी विभागाकडून देण्यात आला असताना दुसरीकडे या विभागाकडूनच ३५ हजार कापूस पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे कापूस क्षेत्र कमी करायचे की वाढवायचे, असा संभ्रम निर्माण झाला आहे.यंदा पावसात सातत्य राहिल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच सरासरी क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. पारंपरिक पीक पद्धतीला बाजूला सारत शेतकऱ्यांनी तूर, उडीद, मूग ही कडधान्ये, तसेच चारा पिकांवर अधिक भर दिला आहे. कृषी विभागाकडूनही कापूस क्षेत्र घटविण्याबाबत वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजिली होती. याचा परिणाम प्रत्यक्षात पेरणीवर झाला असल्याने कपाशीची पाकिटे उरली आहेत. त्यामुळे खाजगी कंपन्यांकडून बियाणांची मार्केटिंग करून ही पाकिटे कृषी विभागाच्या माथी मारण्याचाच हा प्रकार असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. खरिपाच्या आढावा बैठकीनुसार कपाशीच्या १५ लाख १२ हजार ४४४ पाकिटांची मागणी यापूर्वी कृषी विभागाने केली असून, त्या तुलनेत कमी लागवड झाली आहे. असे असतानाही अधिकच्या पाकिटांची गरज भासलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.म्हणे शिल्लक राहिल्यास परत घेणारपाकिटांची आॅर्डर पदरी पाडून घेण्यासाठी खाजगी कंपनीतील अधिकारी, कर्मचारी कृषी विभागात ठाण मांडून बसले होते. पेरणीची आकडेवारी समोर असतानाही कृषी अधिकाऱ्यांनीही घाईघाईत तब्बल ३५ हजार पाकिटांची मागणी केली आहे.खरीप क्षेत्र ६ लाख ५८ हजार हेक्टर असताना त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागणी केलेल्या कापूस पाकिटांचा पुरवठा देखील तालुक्यानुसार झाला असून, वाटपाबाबत अद्यापही नियोजन दिसून येत नाही.