शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अवकाळीच्या नुकसानीला कृषी विभागाचा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

सोयगाव : तालुक्यातील तीन गावात अवकाळी व गारपिटीसह झालेल्या पावसाने रब्बीच्या पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यात ...

सोयगाव : तालुक्यातील तीन गावात अवकाळी व गारपिटीसह झालेल्या पावसाने रब्बीच्या पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यात जरंडी, कंकराळा शिवारात गारपीट झाल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तरी देखील कृषी विभागाच्या वतीने येथील नुकसानीचे पंचनामे न करता महसूल प्रशासनाला तालुक्यात नुकसान निरंक असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या या अहवालाने तालुक्यात खळबळ निर्माण झाली असून शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

गेल्या आठवड्यात सोयगाव मंडळातील जरंडी, कंकराळा, माळेगाव, पिंपरी, निंबायती या गावात अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांना झोडपले. याबाबत तालुका महसूल विभागाने गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. याबाबत तालुका कृषी विभागाने नुकसानीची पाहणी न करताच अहवाल निरंक दिल्याची माहिती सोमवारी समोर आली.

अद्यापही तालुका कृषी विभागाने या पाच गावातील अवकाळीच्या नुकसानीची पाहणी केलेली नाही. महसूल विभागाला निरंक अहवाल देऊन कृषी विभाग नामानिर्माळा झाला आहे. त्यामुळे जरंडी, कंकराळा,निंबायती या तीन गावात नुकसान होऊन देखील अहवाल निरंक जातोच कसा असे गावकरी विचारू लागले आहेत.

-----

फोटो : सोयगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसात आडव्या पडलेल्या ज्वारीचे पीक दुसऱ्या छायाचित्रात गहू पिकाचे झालेले नुकसान.