शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पुन्हा मुदतवाढ

By admin | Updated: July 30, 2014 01:02 IST

नांदेड : विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्यामुळे राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांना राज्य शासनाने ११ एप्रिल २०१४ पासून सहा महिने मुदतवाढ दिली आहे

नांदेड : विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्यामुळे राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांना राज्य शासनाने ११ एप्रिल २०१४ पासून सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे संचालक मंडळांना जवळपास तिसऱ्यांदा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ मधील कलम १४ (३) (ए) च्या तरतुदीनुसार टंचाई, दुष्काळ, पूर, आग, किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, पावसाळा, यामुळे तसेच राज्य विधानमंडळ, संसदेचा किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाचा कोणताही निवडणूक कार्यक्रम आणि कोणत्याही बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम एकाच वेळी आल्यामुळे किंवा राज्य शासनाच्या मते विशेष असेल अशा इतर कोणत्याही कारणामुळे लोकहितास्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकासंदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याकरिता निश्चित असे आदेश दिलेले आहेत. अशा कृषी उत्पन्न बाजार समित्या वगळून ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांच्या बाबतीत नामनिर्देशनाचा टप्पा सुरु झालेला नाही, अशा सर्व बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका या अधिसुचनेच्या दिनांकापासून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.जुलै १०१३ मध्ये मुदत संपलेल्या बाजार समित्यांची निवडणूक सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होण्याचे संकेत होते, मात्र लोकसभेच्या निवडणुकीमुळे बाजार समित्यांच्या निवडणूका ११ आॅक्टोबर २०१३ पासून सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जवळ येवून ठेपल्यामुळे पून्हा बाजार समित्यांच्या निवडणूका सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.मुदतवाढ मिळाल्यामुळे समित्यातील संचालक मंडळ कायम राहणार असल्याने अर्धवट स्थितीत असलेल्या विकासकामांना गती मिळणार आहे.(प्रतिनिधी)