शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पुन्हा मुदतवाढ

By admin | Updated: July 30, 2014 01:02 IST

नांदेड : विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्यामुळे राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांना राज्य शासनाने ११ एप्रिल २०१४ पासून सहा महिने मुदतवाढ दिली आहे

नांदेड : विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्यामुळे राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांना राज्य शासनाने ११ एप्रिल २०१४ पासून सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे संचालक मंडळांना जवळपास तिसऱ्यांदा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ मधील कलम १४ (३) (ए) च्या तरतुदीनुसार टंचाई, दुष्काळ, पूर, आग, किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, पावसाळा, यामुळे तसेच राज्य विधानमंडळ, संसदेचा किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाचा कोणताही निवडणूक कार्यक्रम आणि कोणत्याही बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम एकाच वेळी आल्यामुळे किंवा राज्य शासनाच्या मते विशेष असेल अशा इतर कोणत्याही कारणामुळे लोकहितास्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकासंदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याकरिता निश्चित असे आदेश दिलेले आहेत. अशा कृषी उत्पन्न बाजार समित्या वगळून ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांच्या बाबतीत नामनिर्देशनाचा टप्पा सुरु झालेला नाही, अशा सर्व बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका या अधिसुचनेच्या दिनांकापासून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.जुलै १०१३ मध्ये मुदत संपलेल्या बाजार समित्यांची निवडणूक सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होण्याचे संकेत होते, मात्र लोकसभेच्या निवडणुकीमुळे बाजार समित्यांच्या निवडणूका ११ आॅक्टोबर २०१३ पासून सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जवळ येवून ठेपल्यामुळे पून्हा बाजार समित्यांच्या निवडणूका सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.मुदतवाढ मिळाल्यामुळे समित्यातील संचालक मंडळ कायम राहणार असल्याने अर्धवट स्थितीत असलेल्या विकासकामांना गती मिळणार आहे.(प्रतिनिधी)