शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

अडीच लाख शेतकऱ्यांच्या दारापर्यंत कृषी योजना पोहोचल्या

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात १८ लाख शेतकरी असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे़

लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात १८ लाख शेतकरी असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे़ लातूर विभागाने आतापर्यंत अडीच लाख शेतकऱ्यांच्या बांधावर योजना पोहोचवल्या आहेत़ पॉली हाऊस, राष्ट्रीय फलोत्पादन, पीक प्रात्यक्षिके, नेट हाऊस, क्षेत्र विस्तार आदी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषीदिन म्हणून मंगळवारी साजरा होत आहे़ त्यानिमित्त जिल्हास्तरीय मेळावे घेऊन या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे़ मृग नक्षत्र कोरडे गेले आहे़ आर्द्रा नक्षत्रातही अद्याप पाऊस झाला नाही़ परिणामी यंदा फक्त २ टक्केच पेरण्या झाल्या आहेत़ जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ७० ते ८० मि़मी़ पाऊस झाल्यानंतर पेरण्या होऊ शकतात़ परंतु इतका पाऊस अद्याप झाला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात चर खोदण्यासाठी प्रोत्साहान देण्यात येत आहे़ चर खोदलेल्या शेतात जर ६० टक्के मि़मी़पाऊस झाला तर तेथे पेरणी करता येऊ शकते़ या अनुषंगाने शेतकऱ्यांना मंगळवारी होत असलेल्या मेळाव्यात माहिती दिली जाणार असल्याचे कृषी सहायक संचालक के.एन. देशमुख यांनी दिली़ लातूर विभागातील १८ लाख शेतकऱ्यांपैकी अडीच लाख शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून शंभर टक्के शेतकऱ्यांना या योजना माहित होण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनापासून जनजागृती करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले़ शंभर, पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत़ त्यात ठिबक तुषार योजना, राष्ट्रीय फलोत्पादन योजना, अवजारे योजना, सिमेंट बंधारे, नाला बंधारे, खाजगी नर्सरी स्थापने, पॉलिहाऊस, पॅकिंग हाऊस, ग्रीन शेड-नेट हाऊस आदी योजनांचा समावेश आहे़ पिक उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत़ परंतु या योजनांची माहिती शेतकऱ्यांना होत नाही़ त्यामुळे लाभापासून शेतकरी वंचित राहतात़ गरजू व प्रयोगशिल शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाने जिल्हा मेळाव्यांचे आयोजन केले असल्याचे सहायक संचालक देशमुख यांनी सांगितले़अध्यक्षांच्या उपस्थितीत मेळावा...लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे़ जि़प़अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, डेप्युटी सीईओ या मेळाव्यात कृषी योजनांची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देणार आहेत. जिल्हा परिषद व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी योजनांचा आढावाच यावेळी घेतला जाईल.