शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

‘कृषी सहायक घरी, सल्ला वार्‍यावरी’

By admin | Updated: June 3, 2014 00:43 IST

कडा: शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी. शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.

 कडा: शेतकर्‍यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळावी. शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अनेक कृषी सहायक गावात जातच नसल्याने शेतकर्‍यांना सल्ला मिळत नाही. यामुळे अशिक्षित शेतकर्‍यांची पंचाईत होत आहे. कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषी सहायकांकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेती विषयक सल्ला मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी तसेच शासनाकडून राबविण्यात येणार्‍या योजना योग्य प्रकारे राबविल्या जात आहेत का याची पाहणीसह इतर उद्देशाने कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात तब्बल ४४ कृषी सहायकांची नेमणूक कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या कृषी सहायकांनी ठरवून दिलेल्या गावांमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना शेती विषयक मार्गदर्शन करणे , शासनाच्या योजनांची माहिती देणे असा या मागचा उद्देश असला तरी कृषी सहायक मात्र आठवड्यातून एकदाच ठरवून दिलेल्या गावात जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले. यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर सल्ला व मार्गदर्शन मिळत नाही. तालुक्यातील ४४ पैकी अनेक कृषी सहायक मुख्यालयी न राहता इतरत्रच राहतात. ते आठवड्यातून एखादेवेळीे गावात जाता व ठराविक शेतकर्‍यांचीच भेट घेतात. यामुळे इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शन हवे असेल तर त्यांना कृषी सहायक शोधावा लागतो. वेळेवर कृषी सहायक मिळत नसल्याने त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नसल्याचे संजय खंडागळे यांनी सांगितले. तालुक्यात अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन कृषी सहायकांना संबंधित गावातच रहावे व त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी सचिन वाघुले यांनी केली आहे. तसेच जे कृषी सहायक मुख्यालयी न राहता इतर ठिकाणी राहून आपला कारभार हाकतात अशांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात आष्टी तालुका कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी पी.के. शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, जे कृषी सहायक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत नाहीत किंवा मुख्यालयी राहत नाही, अशांची लेखी तक्रार आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. (वार्ताहर)