शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

औरंगाबाद शहर बससाठी एस.टी.सोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:26 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका १०० मिडी बस खरेदी करणार आहे. दिवाळीपूर्वी ३० पेक्षा अधिक बस टाटा कंपनीकडून ...

ठळक मुद्देपहिल्या माळेचा मुहूर्त : पाडव्याला शुभारंभ करण्याचा निर्धार

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका १०० मिडी बस खरेदी करणार आहे. दिवाळीपूर्वी ३० पेक्षा अधिक बस टाटा कंपनीकडून प्राप्त होणार आहेत. या बस चालविण्याची जबाबदारी आज एस.टी. महामंडळाने स्वीकारली. महामंडळाने नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेचा मुहूर्त साधत महापालिकेसोबत सामंजस्य करारही केला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एस.टी. आणि मनपा यांच्यातील हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. पाच वर्षे महामंडळ बस चालविण्याची सेवा देणार आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी झाली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल आणि स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. महापालिकेने खरेदी केलेल्या १०० बस पाच वर्षांसाठी एस.टी. महामंडळ चालविणार, असे करारात ठरले. आॅक्टोबर अखेरपर्यंत बस शहरात दाखल होतील. उर्वरित बस जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत येतील. प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न दररोज स्मार्ट सिटी विकास महामंडळात जमा होईल. तिकीट दर, वाहतुकीचे मार्ग ठरविण्याचा अधिकारही स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाला राहील. १०० बससाठी लागणारे मनुष्यबळ, बसची देखभाल, पार्किंग व्यवस्था एस.टी. महामंडळ करणार आहे. याबाबत एस.टी.ला दरमहा ठराविक भाडे देण्यात येईल. बससेवा सुरू करण्यासाठी लागणाºया सर्व परवानग्या मिळविण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीची म्हणजेच मनपाची राहणार आहे. बसथांबे अद्ययावत करणे, जागा निश्चित करण्याचे काम मनपाचे राहणार आहे. ठिकठिकाणी नियंत्रण कक्ष उघडण्यात येतील. शालेय विद्यार्थी, अंध, दिव्यांग बांधवांना या सेवेत अनुक्रमे ६७, ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात १९९१ पासून एस.टी. महामंडळ शहर बससेवा चालवत आहे. आतापर्यंत महामंडळाला १ हजार १८७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.बससेवेची वैशिष्ट्ये१२५ रस्त्यांवरून नवीन बस धावतील.४५० कर्मचारी एस.टी.चे राहतील.११० बसथांबे अद्ययावत उभारणार.

टॅग्स :Bus DriverबसचालकPublic Transportसार्वजनिक वाहतूक