शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

तूर खरेदीवरून पुन्हा वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:37 IST

फेअर अ‍ॅव्हरेज क्वॉलिटी (एफएक्यू ) दर्जाची तूर नसल्याने गुणवत्ता तपासणी कर्मचा-याने शुक्रवारी दोन शेतक-यांची तूर निकृष्ट असल्याचे सांगितले. चाळणी न करता तूर तपासली जात असल्याने संतापलेल्या त्या शेतक-यांनी अर्धा किलो तूर जाळून शासनाचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : फेअर अ‍ॅव्हरेज क्वॉलिटी (एफएक्यू ) दर्जाची तूर नसल्याने गुणवत्ता तपासणी कर्मचा-याने शुक्रवारी दोन शेतक-यांची तूर निकृष्ट असल्याचे सांगितले. चाळणी न करता तूर तपासली जात असल्याने संतापलेल्या त्या शेतक-यांनी अर्धा किलो तूर जाळून शासनाचा निषेध केला. या गोंधळामुळे अर्धा ते एक तास जाधववाडीतील शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली होती.जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर मागील ५ दिवसांमध्ये ३१० शेतक-यांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले असून, २० शेतक-यांकडून १७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तूर खरेदीचे काम नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात येत आहे. आज सकाळी तूर खरेदी केंद्राबाहेर तीन ते चार पिकअप वाहने व दोन ट्रॅक्टर भरून शेतक-यांनी तूर विक्रीस आणली होती. येथे गुणवत्ता तपासणी कर्मचारी विनायक डक हे तुरीची तपासणी करीत होते. यावेळी वरूड काझी येथील इलियास बेग व कृष्णा दांडगे या दोन शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आणली होती. त्यांच्यातील एक जणाची तूर तपासणी करताना त्यात भुंगे आढळून आले. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सरासरी चांगला दर्जा (एफएक्यू) नसल्याने ती तूर रिजेक्ट करण्यात आली. पहिले तूर चाळणी यंत्रात साफ करून मग तपासणी का करीत नाही, असा सवाल उपस्थित करून केंद्राबाहेर येऊन अर्धा किलो तूर जमिनीवर टाकून ती जाळण्याचा प्रयत्न केला. शासनविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे गोंधळ उडाला गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रप्रमुख ए. एस. तटवारे यांनी केंद्राचे शटर खाली घेतले. काही वेळात जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खाडे, बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठही तेथे दाखल झाले. खाडे यांनी त्या दोन शेतक-यांनी आणलेल्या तुरीची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले. यावेळी पिकअप वाहनामध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या पोत्यातून तुरी काढून विनायक डक यांनी पुन्हा तपासणी केली व निकृष्ट तूर असल्याचे अहवाल दिला. यावेळी टीव्ही चॅनलच्या कॅमेरामनने संपूर्ण तपासणीची शूटिंग केली. यानंतर ‘वाद’ मिटला. नंतर शिल्लक राहिलेल्या शेतक-यांच्या तुरीची तपासणी करण्यात आली.याआधी ५ फेब्रुवारी रोजी काही शेतक-यांनी कृउबा समिती येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला होता. त्यावेळी हेक्टरी कमी तूर खरेदी करीत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला होता. असे प्रकार नेहमी होत असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी कर्मचा-यांनी केली.