शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उडीद-मुगानंतर आता सोयाबीनचाही प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:41 IST

जिल्ह्यात तीन ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर केले असले तरीही त्या तिन्ही ठिकाणी अजून सोयाबीन खरेदी सुरू झाली नाही. तर व्यापारी मॉईश्चरच्या नावाखाली लूट करीत असल्याचा आरोप शेतकºयांतून केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात तीन ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर केले असले तरीही त्या तिन्ही ठिकाणी अजून सोयाबीन खरेदी सुरू झाली नाही. तर व्यापारी मॉईश्चरच्या नावाखाली लूट करीत असल्याचा आरोप शेतकºयांतून केला जात आहे.यंदा शासनाने सोयाबीनला तीन हजारांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकºयांच्या हाती अठराशे ते चोवीससे रुपये पडत आहेत. किरकोळ ढीग दोन हजार आठशे रुपयांपर्यंतच्या किमतीतही घेतले जात आहेत. तर दुसरीकडे सोयाबीन खरेदी केंद्र वेळेत सुरू केले जात नाहीत. नाफेडची खरेदी हिंगोलीत खरेदी-विक्री संघामार्फत केली जाणार आहे. या संस्थेच्या संबंधितांना विचारले तर त्यांनी सोयाबीन उत्पादकतेचा अधिकृत कोणताच पुरावा आला नसल्याचे सांगितले. मार्केटिंग फेडरेशनने दिलेल्या सूचनांनुसारच जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक यांनी पीक पाहणी प्रयोगातून निश्चित केलेल्या आणेवारीप्रमाणेच मालाची खरेदी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच उडीद व मुगाची उत्पादकता कमी असल्याने त्या तुलनेत खरेदी सुरू असल्याचेही ते म्हणाले. तर आता सोयाबीनचा अहवाल मिळताच केला जाईल, असे सांगितले. दुसरीकडे कृषी विभाग मात्र १५ नोव्हेंबरपर्यंत हा अहवाल तयार होईल, असे सांगत होता. त्यामुळे सोयाबीनची हमीभावाने खरेदी बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी राहण्याची शक्यता आहे.संतोष टारफे यांचे निवेदनआ.संतोष टारफे यांनी कळमनुरी येथेही नाफेडमार्फत हमीभावात शेतीमाल खरेदी सुरू करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तर मूग व उडदाची हेक्टरी तीन क्विंटलची मर्यादा उठवा, कापूस खरेदी केंद्र सुरू करून ७ हजार हमीभाव द्या, कर्जमाफी तातडीने शेतकºयांच्या खात्यावर जमा करा आदी मागण्या केल्या आहेत.