शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

ठाकरेंच्या दौऱ्यानंतरच ‘भाई-दादा’ गिरीवर निर्णय

By admin | Updated: April 23, 2016 01:22 IST

औरंगाबाद : शिवसेनेत पहिल्या फळीविरोधात दुसऱ्या फळीचे राजकारण पेटले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मे महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेत पहिल्या फळीविरोधात दुसऱ्या फळीचे राजकारण पेटले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मे महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. त्या दौऱ्यानंतरच सेनेतील ‘भाई-दादा’गिरीचे राजकारण संपुष्टात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सभागृह नेता राजेंद्र जंजाळ आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यात हात-पाय तोडण्याची भाषा दोन दिवसांपासून सुरू आहे. दोघांच्या कृतीचे समर्थन करण्यात अर्थ नाही. कोण बरोबर, कोण चूक हे तपासणे अवघड होऊन बसले आहे. परंतु खैरेंकडून असे होणे अपेक्षित नव्हते. हे प्रकरण खालच्या पातळीवर गेले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे. हात-पाय तोडण्याची भाषा पक्षचौकटीच्या बाहेरची आहे, असे एका मुंबईतील नेत्याने लोकमतशी बोलताना सांगितले. पक्षात पहिल्यांदाच अशा बेशिस्तीने कळस गाठलेला नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असतानाच पालकमंत्री रामदास कदम विरुद्ध खैरे आणि आता त्यात सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांची भर पडल्यामुळे सेनेतील राजकारण ढवळून निघाले आहे. वरिष्ठ पदाधिकारी, नेते मंडळी अशा पद्धतीने अधिकारशाहीसाठी भांडत असतील तर खालच्या पातळीवरील पदाधिकारी कोणत्या थरावर असतील, यावरून शिवसेनेच्या वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर शिवजलक्रांती मोहिमेच्या अनुषंगाने बैठक घेतली. २ ते १२ मेदरम्यान कधीही ठाकरेंचा मराठवाडा दौरा निश्चित होईल. लातूरपासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. दौऱ्यानंतर सेनेतील दुफळीचा शेवट होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. संपर्कप्रमुख म्हणाले.....संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, खैरे विरुद्ध जंजाळ हे प्रकरण मातोश्रीवर गांभीर्याने घेतले गेले आहे. पक्षप्रमुखच या प्रकरणात निर्णय घेतील. माझ्या पातळीवरचा हा विषय नाही.