शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

१० वर्षे झाली तरीही भरतीचा घोळ संपेना

By admin | Updated: June 11, 2014 00:52 IST

औरंगाबाद : ११२४ कर्मचारी भरतीला ४ जानेवारी रोजी १० वर्षे झाली तरीही त्या भरतीचा घोळ अजून संपत नाहीय.

औरंगाबाद : ११२४ कर्मचारी भरतीला ४ जानेवारी रोजी १० वर्षे झाली तरीही त्या भरतीचा घोळ अजून संपत नाहीय. २००३-०४ मध्ये पालिकेने १९९० पासून दैनंदिन वेतनावर असलेले कर्मचारी शासनादेशाने सेवेत कायम केले. त्यामध्ये अनेक अफरातफरी करीत कमी वयाचे, बोगस नावाचे कर्मचारी भरती करून घेण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत कायम होऊन १० वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा विचार सुरूआहे. २००३ ते २०१४ या काळात ६ आयुक्त पालिकेत आले आणि गेले; मात्र कुणीही ११२४ नोकरभरतीतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका देण्यासाठी पाऊल उचलले नाही. त्यामागील कारण म्हणजे नोकरभरतीवरून २००७ पासून विधिमंडळात झालेला गाजावाजा होय.शासन आदेशावरून भरतीची चौकशी झाल्यामुळे २० कर्मचारी सेवेतून कमी करण्यात आले.१२३ कर्मचाऱ्यांच्या बनावट टी.सी. समोर आल्या. १०२ कर्मचाऱ्यांकडे पहिल्या वेतनाची पावती नाही. ५५ जणांना शासनमान्यता नाही. १६८ कर्मचारी आरक्षणात बसत नाहीत. ४८१ जणांना सेवापट न देण्याचा अहवाल शासन आदेशाने नेमलेल्या समितीने पुढे आणला.कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांसाठी कामगार संघटनांनी आंदोलने केली, तर ती नोकरभरती बेकायदेशीर आहे, त्याची चौकशी व्हावी, यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलनेकेली.