शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर प्रिंट बघायला मिळणार

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रावरील बटन दाबल्यानंतर मतदारांना आपले मतदान बरोबर झाले की, नाही याची खातरजमा करता येणार आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रावरील बटन दाबल्यानंतर मतदारांना आपले मतदान बरोबर झाले की, नाही याची खातरजमा करता येणार आहे. कारण मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आता मतदान यंत्रातून त्याची प्रिंट निघणार आहे. मात्र, ही प्रिंट मतदारांना मिळणार नाही, तर ती काही वेळ दिसून लगेचच खाली ठेवलेल्या बॉक्समध्ये पडणार आहे. आयोगातर्फे राज्यात औरंगाबादसह केवळ चार जिल्ह्यांतच ही सुविधा वापरली जाणार आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही मतदान यंत्रांचा वापर होणार आहे. काही ठिकाणी आणखी आधुनिक स्वरूपाची मतदान यंत्रे वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. बऱ्याच वेळा मतदारांकडून मतदान यंत्रांबाबत तक्रारी केल्या जातात. एक बटन दाबले तरी दुसऱ्यालाच मतदान झाले, असा आरोपही केला जातो. या पार्श्वभूमीवर आयोगाने मतदान प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान यंत्रातून त्याची प्रिंट बाहेर येणार आहे. त्यामुळे मतदाराला आपले मतदान बरोबर नोंदविले गेले की, नाही हे कळू शकणार आहे. मात्र, मतदाराला ही प्रिंट मिळणार नाही. कारण हे प्रिंटर एका काचेखाली राहणार असून, त्यातून प्रिंट बाहेर निघाल्यानंतर ती सुमारे दहा सेकंद दिसू शकेल. त्यानंतर ती आपोआप खाली ठेवलेल्या डब्यात पडेल. राज्यात औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि नागपूर या चार जिल्ह्यांत हा प्रयोग राबविला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे नुकत्याच उत्तराखंड राज्यातून डेहराडून आणि हरिद्वार येथून ७ हजार मतदान यंत्रे मागविण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्येच ही यंत्रे वापरली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले.