शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

दीड महिन्यानंतर पाऊस परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:06 IST

दीड महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

जालना : दीड महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे कोमेजू लागलेल्या कपाशी पिकाला जीवदान मिळाले.जालना तालुक्यातील माळशेंद्रा, पीरपिंपळगाव, वंजारउम्रद, गोंदेगाव, घाणेवाडी, जामवाडी शिवारात सायंकाळी सातच्या सुमारास मध्यम पाऊस झाला. तसेच भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, केदारखेडा परिसरात सायंकाळी सात वाजता पावसाने हजेरी लावली. गोषेगाव, खडकी, लतीफपूर, विटा, बोरगाव खडक, सिरसगाव, पंढरपूरवाडी, निमगाव, कुंभारी, नांजा, क्षिरसागर, रजाळा, खडकी, धावडा, पोखरी, भोरखेडा, वडोद तांगडा या परिसरातही पावसाने हजेरी लावली. अंबड तालुक्यातील शहागड, वडीगोद्री, वाळकेश्वर, झिरपी, शहापूर, सुखापुरी फाटा, धाकलगाव, वसंतनगर, रेवलगाव, बारसवाडा, सोनक पिंपळगाव परिसात सायंकाळी साडेसातनंतर पावसास सुरुवात झाली. तर परतूर शहरासह तालुक्यातील बामणी, मसला, वरफळ शिवारात रात्री आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अर्धा तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी वाहिले. तर परिसरातील शेती पिकांना काही अंशी जीवदान मिळाले. मंठा तालुक्यातील आर्डा, केंधळी, बरबडा, तळणी, नेलेखेडा, तळतोंडी, उस्वद परिसरात पावसाने हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव, तीर्र्थपुरी, रांजणी, पारडगाव शिवारात रिमझिम पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यात सर्वदूर रिमझिम पाऊस झाला. पावसाअभावी पिके सुकून गेली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. जिल्ह्याला आणखी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.बदनापूर तालुक्यातही हजेरीबदनापूर शहरासह तालुक्यातील मालेवाडी, दाभाडी, सागरवाडी, अकोला नीकळक, गेवराई, शेलगाव इ. भागांत तासभर पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.