शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

निम्या पावसाळ्यानंतरही तलाव कोरडेठाक

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

तामलवाडी : पावसाळ्यातील दोन महिन्याचा कालावधी संपला तरी तामलवाडी परिसरात अद्याप मोठा पाऊस झाला नाही

नाशिक : महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर तोट्यात चालत असून, ते चालविण्यासाठी ठेकेदाराचा शोध सुरू असताना, आता आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याचा अट्टहास सुरू आहे. त्यापैकी दोन नाट्यगृहे नाशिकरोड विभागात बांधण्याचे घाटत असून, ती कशी चालतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पंचवटीत एक नाट्यगृह बांधण्यात येत असून, आमदार निधीच्या या कामात चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, अशी अवस्था होणार आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर बांधण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत हे नाट्यगृह नाटकांपेक्षा तेथील दुरवस्थेनेच गाजत आहे. कलामंदिराचे दर वाढवूनही खर्च त्या प्रमाणात निघत नाही. सध्या या नाट्यगृहावर ८० लाख खर्च होतो आणि उत्पन्न मात्र ५० ते ६० लाख रुपये मिळते. नाट्यगृह हा महापालिकेच्या व्यवसायाचा भाग नाही, तर ती सामाजिक दायित्वातून बांधलेली वास्तू असल्याने त्या विषयी फार गांभीर्याने विचार केला जात नाही. तथापि, सत्ताधिकाऱ्यांपैकी काहींनी हेच निमित्त करून घाट्यात चाललेल्या कलामंदिराला ठेकेदाराच्या कह्यात देण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च आणि त्याला आलेली अवकळा बघून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच अशा प्रकाराची कामे करणे हे पालिकेचे काम नाही, असे सांगत असतानादेखील आता मनसेच्याच कारकीर्दीत हा अट्टहास होत आहे.गेल्या पंचवार्षिक कारकीर्दीत नाशिकरोड येथील कोठारी यांच्या आरक्षित जागेत नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभागातदेखील नाट्यगृह बांधण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याची तयारी सुरू आहे. तसेच पंचवटीत मखमलाबाद नाका म्हणजेच सध्याच्या पालिका विभागीय कार्यालयाजवळील भांडाराच्या जागेतही नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. आमदार निधीतून हे नाट्यगृह बांधण्यात येत असल्याचे सांगितले जात असताना आमदार निधी दोन कोटी, तर सात कोटी नाशिक महापालिका खर्च करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे ‘कालिदास’ अडचणीत असल्याचे निमित्त करून त्याचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे मात्र आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याची तयारी सुरू झाल्याने ही भविष्यकालीन ठेक्याची तरतूद तर नव्हे ना, असा प्रश्न केला जात आहे. (प्रतिनिधी)