शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

निम्या पावसाळ्यानंतरही तलाव कोरडेठाक

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

तामलवाडी : पावसाळ्यातील दोन महिन्याचा कालावधी संपला तरी तामलवाडी परिसरात अद्याप मोठा पाऊस झाला नाही

नाशिक : महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर तोट्यात चालत असून, ते चालविण्यासाठी ठेकेदाराचा शोध सुरू असताना, आता आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याचा अट्टहास सुरू आहे. त्यापैकी दोन नाट्यगृहे नाशिकरोड विभागात बांधण्याचे घाटत असून, ती कशी चालतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पंचवटीत एक नाट्यगृह बांधण्यात येत असून, आमदार निधीच्या या कामात चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, अशी अवस्था होणार आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर बांधण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत हे नाट्यगृह नाटकांपेक्षा तेथील दुरवस्थेनेच गाजत आहे. कलामंदिराचे दर वाढवूनही खर्च त्या प्रमाणात निघत नाही. सध्या या नाट्यगृहावर ८० लाख खर्च होतो आणि उत्पन्न मात्र ५० ते ६० लाख रुपये मिळते. नाट्यगृह हा महापालिकेच्या व्यवसायाचा भाग नाही, तर ती सामाजिक दायित्वातून बांधलेली वास्तू असल्याने त्या विषयी फार गांभीर्याने विचार केला जात नाही. तथापि, सत्ताधिकाऱ्यांपैकी काहींनी हेच निमित्त करून घाट्यात चाललेल्या कलामंदिराला ठेकेदाराच्या कह्यात देण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च आणि त्याला आलेली अवकळा बघून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच अशा प्रकाराची कामे करणे हे पालिकेचे काम नाही, असे सांगत असतानादेखील आता मनसेच्याच कारकीर्दीत हा अट्टहास होत आहे.गेल्या पंचवार्षिक कारकीर्दीत नाशिकरोड येथील कोठारी यांच्या आरक्षित जागेत नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभागातदेखील नाट्यगृह बांधण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याची तयारी सुरू आहे. तसेच पंचवटीत मखमलाबाद नाका म्हणजेच सध्याच्या पालिका विभागीय कार्यालयाजवळील भांडाराच्या जागेतही नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. आमदार निधीतून हे नाट्यगृह बांधण्यात येत असल्याचे सांगितले जात असताना आमदार निधी दोन कोटी, तर सात कोटी नाशिक महापालिका खर्च करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे ‘कालिदास’ अडचणीत असल्याचे निमित्त करून त्याचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे मात्र आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याची तयारी सुरू झाल्याने ही भविष्यकालीन ठेक्याची तरतूद तर नव्हे ना, असा प्रश्न केला जात आहे. (प्रतिनिधी)