शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घ प्रतीक्षेनंतर विधि विद्यापीठ सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:55 IST

अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या (एमएनएलयू) २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात गुरुवार महत्त्वाचा दिवस ठरला. अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या (एमएनएलयू) २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. देशभरातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक वर्षाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना शिकविण्यासही सुरुवात झाली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.औरंगाबाद शहरात राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. मात्र मुंबई, नागपूर, पुणे सोडून औरंगाबादेत मंजूर झालेल्या विद्यापीठाला विरोध होऊ लागला. यातून मुंबई, नागपूर येथेही विधि विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र अगोदर घोषणा झालेल्या औरंगाबादपूर्वीच मुंबई आणि नागपूर येथील विधि विद्यापीठाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. यात औरंगाबाद येथे स्थापन करण्यासाठी हालचाल सुरू झालेली ‘आयआयएम’ संस्था नागपूरला पळविण्यात आली. यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका सुरू झाली. याचा परिणाम एमएनएलयू स्थापन होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. एमएलएलयूच्या कुलपती सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची नेमणूक करण्यात आली. यानंतर ६ मार्च रोजी डॉ. एस. जी. गुप्ता यांची विद्यापीठाच्या ओएसडीपदी निवड झाली. तर १६ मार्च रोजी कुलगुरूपदी डॉ.एस.सूर्यप्रकाश यांची नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही अधिकाºयांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन विद्यापीठाला आवश्यक असलेल्या सर्व सेवा राज्य सरकारच्या मदतीने उपलब्ध करून घेऊन गुरुवारपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरातील शैक्षणिक क्षेत्रात या विद्यापीठामुळे नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे.न्यायमूर्तींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागतविधि विद्यापीठात पहिल्याच वर्षी बी.ए.एलएल.बी. या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. या पहिल्या बॅचसाठी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ८ तर उर्वरित विद्यार्थी हे इतर राज्यांतील आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, न्यायमूर्ती दिनेश गंगापूरवाला, कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि बी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजीवनी मुळे मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना न्यायमूर्ती बोर्डे म्हणाले, शहरातील विधि शिक्षणासंबंधी वेगळे वातावरण आहे. विधि क्षेत्रात करिअर करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, याठिकाणी उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती गंगापूरवाला म्हणाले, विद्यार्थ्यांनी पुस्तकी अभ्यासाच्या पुढे जाऊन अभ्यास केला पाहिजे. देशभर गाजत असलेल्या रोहिग्यांच्या सारख्या प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असेही त्यांनी सांगितले.